शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

वाहतूककोंडीने जुने ठाणे पुरते गुदमरले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 03:19 IST

काही वर्षांपूर्वी ठाणे म्हणजे नौपाडा अशीच काहीशी ओळख होती. तेव्हाचे ठाणे आतासारखे पसरलेले नव्हते. वाड्यांमुळे या भागाला वेगळी अशी शोभा होती.

अजित मांडके, ठाणेकाही वर्षांपूर्वी ठाणे म्हणजे नौपाडा अशीच काहीशी ओळख होती. तेव्हाचे ठाणे आतासारखे पसरलेले नव्हते. वाड्यांमुळे या भागाला वेगळी अशी शोभा होती. छानसा टूमदार असा परिसर होता. पण, आज इमारती आणि समस्यांच्या चक्रव्यूहात हा परिसर अडकल्याने यातून बाहेर कसे येणार किंवा कसे बाहेर काढणार, हा खरा प्रश्न आहे.एकेकाळी वाड्यांची संस्कृती, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जुन्या ठाण्याची ओळख आता केवळ वाहतूककोंडी म्हणूनच होऊ लागली असल्याचे चित्र मागील काही वर्षांत उभे राहिले आहे. धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न, रेल्वेस्थानक परिसरात वाढणारी वाहतूककोंडी, त्यात पार्किंगचा उडालेला बोजवारा आणि रस्त्यांच्या रुंदीकरणानंतरही फेरीवाल्यांनी मिळवलेला कब्जा, शेअर रिक्षाचालकांचा असह्य होणारा त्रास, यामुळे रेल्वेस्थानक परिसरातून आजूबाजूला किंबहुना अगदी हाकेच्या अंतरावर शहराची चौपाटी म्हणून ओळख असलेल्या मासुंदा तलावाकडे जायचे जरी झाले, तरी वाहतूककोंडीमुळे अनेक जण या ठिकाणी जाण्यासाठी काचकूच करताना दिसतात. त्यामुळे जुने ठाणे आता कोंडीचे ठाणे होते की काय, अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.नौपाड्याला तसा फार पूर्वीचा इतिहास आहे. या ठिकाणी भास्कर कॉलनीत एकेकाळी वाड्यांची संस्कृती होती. आता त्याठिकाणी कालांतराने इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे आता या भागात हाताच्या बोटांवर मोजता येतील, एवढेच म्हणजे दोन ते तीन वाडे शिल्लक राहिले आहेत. त्यातही या ठिकाणी अरुंद असलेले रस्ते यामुळे येथील विकासही खुंटला आहे. रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेला परिसर म्हणूनही या भागाकडे पाहिले जात असले, तरी आजघडीला हा परिसरच असंख्य समस्यांनी ग्रासलेला आहे. नौपाड्यात बी केबिन परिसर, चेंदणी कोळीवाडा, शिवाजी पथ, गोखले रोड, राममारुती रोड, एलबीएस मार्ग, महात्मा गांधी रोड, स्टेशन परिसर, मासुंदा तलाव, संपूर्ण चरई आदी हा भाग समाविष्ट होतो. या भागाची लोकसंख्या सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे. असे असले तरी आज या भागातून येणाऱ्याजाणाºयांची संख्या मात्र अधिक आहे. याच भागात रेल्वेस्थानक, एसटी, टीएमटी आगार, रिक्षा आणि टॅक्सीतळ असल्याने येथून रोज सुमारे साडेसहा लाख प्रवासी येजा करत असतात. या भागात आता वाहतूककोंडी ही नित्याचीच झाली आहे. आजही या परिसरात फिरायचा विचार जरी झाला, तरी दोन मिनिटांचे अंतर कापण्यासाठी अर्ध्या तासाच्यावर कालावधी लागतो, हे ‘रिपोर्टर आॅन दी स्पॉट’च्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवले. रेल्वेस्थानक परिसरातूनच प्रवाशांना चालणे कठीण झाले आहे. याठिकाणी रिक्षातळ असताना आणि रिक्षाचालकांना शिस्त लागावी म्हणून पालिकेने येथे एक प्रयोगही केला. परंतु, हा प्रयोगदेखील सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले. लेनच्या बाहेर जाऊन रिक्षा लावणे, वाहतुकीला आणि पादचाºयांना अडथळे निर्माण करणे, सर्रास प्रवाशांबरोबर हुज्जत घालणे, असे प्रकार या शेअर रिक्षाचालकांकडून नेहमीच सुरू असतात. स्टेशन परिसराच्या थोडे बाहेर आल्यानंतरदेखील अलोक हॉटेल, नौपाड्याकडे जाणारा रस्तादेखील या बेशिस्त रिक्षाचालकांनी जसा काही आपल्या नावावर केल्याचे दिसते. या रिक्षाचालकांना शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलीसही त्यांच्यात सहभागी झालेले दिसतात. त्यामुळे या भागातून सकाळ, संध्याकाळ चालणे दुरापास्त होऊन जाते. मासुंदा तलाव परिसरदेखील सकाळी आणि सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी आणि घोडागाड्यांमुळे वेढलेला दिसतो. रोज संध्याकाळी या भागात या दोघांमुळे चक्काजामची परिस्थिती निर्माण झालेली असते. त्यामुळे या भागात फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांचीदेखील घोर निराशा होताना दिसते. गडकरी रंगायतन, ओपन हाउस, गोखले रोड, मल्हार सिनेमा रोड, एलबीएस मार्ग आदी मार्गदेखील सायंकाळी वाहनांच्या गर्दीने व्यापलेले दिसतात.