शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशची Super 8 च्या दिशेने कूच, नेदरलँड्सची हार अन् माजी विजेत्या श्रीलंकेचे संपले आव्हान
2
मोठी बातमी! टीम इंडियाचे दोन शिलेदार T20 World Cup सोडून मायदेशात परतणार
3
'दीड वर्षापूर्वी विमानतळाच्या कामासाठी आलो होतो, आता मंत्री होऊन आलो'; मुरलीधर मोहोळांनी सांगितला 'तो' किस्सा
4
राहुल गांधी रायबरेली की वायनाड सोडणार; दुसरा उमेदवार कोण? नाव आलं समोर
5
स्टार एअरची नागपूर-नांदेड विमानसेवा २७ पासून; सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार चार दिवस असणार
6
कुवैतमध्ये आगीत होरपळून 45 भारतीयांचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी वायुसेनेचे विमान पोहोचले...
7
शाकिब अल हसन झळकला, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला; नेदरलँड्ससमोर उभे केले तगडे लक्ष्य
8
दहशतवादावर पीएम मोदींचा प्रहार; 21 जून रोजी पंतप्रधान थेट जम्मू-काश्मीरला जाणार...
9
“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा
10
बांगलादेशच्या फलंदाजाचा डोळा थोडक्यात वाचला; इगलब्रेचच्या अफलातून झेलने पॉवर प्ले गाजला
11
एकाच मोबाईलमध्ये २ सिम वापरणे महागणार, भरावे लागणार शुल्क; TRAI नियमात करणार बदल
12
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; POCSO प्रकरणात न्यायालयाचा निर्णय
13
Super 8 सोबतच ८ संघ T20 World Cup 2026 साठी पात्र ठरणार; मग पाकिस्तानचं काय होणार?
14
दोनदा घटस्फोट, जुळ्या मुलींची आई चाहत खन्ना पुन्हा प्रेमात? चार वर्ष लहान अभिनेत्याला करतेय डेट
15
सुनेत्रा अजित पवारांनी अखेर संसद गाठलीच; राज्यसभेवर बिनविरोध, बारामतीत आता तीन खासदार
16
Fact Check : लोकसभेवर ११० मुस्लिम खासदार निवडून आल्याचा दावा खोटा
17
यानंतर उपोषण नाही, निवडणुकीत उतरणार अन् नावं घेऊन उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
18
याला म्हणतात धमाका...! ₹७५ रुपयांचा शेअर दहाच महिन्यांत २३०० वर पोहोचला; गुंतवणूकदार मालामाल
19
सौरभ नेत्रावळकरच्या १० मिनिटांच्या मुलाखतीसाठी पत्रकारांनी अर्शदीपसोबत केलं असं काही... 
20
नागपूर जिल्ह्यात स्फोटकांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

नाहक फिरणाऱ्यांची चाचणी; मार्केटमधील गर्दी ओसरली, आयकार्ड बघूनच रेल्वेचे तिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 12:07 AM

काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा असून दुकानांच्या वेळाही बदलल्या आहेत. त्यानुसार ठाण्यात कडक अंमलबजावणी केली जात असली तरी ठाणे परिवहनच्या बसमधून सर्वांनाच प्रवासाची मुभा दिल्याचे चित्र दिसत होते. ठाण्यातील मुख्य मार्केटमध्ये रोजच्या सारखी गर्दी नसली तरी नागरिक थोड्या बहुत प्रमाणात खरेदीसाठी दिसत होते. पोलीस ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून तपासणी करीत होते. विशेष म्हणजे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची ॲंटीजेन चाचणी जांभळी नाक्यावरील मार्केटमध्ये केली जात होती. काेरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पातलीपाडा, वाघबीळनाका, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी, नितिन कंपनी, तिनहातनाका, जांभळीनाका, कोर्टनाका आदींसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात होती. फक्त अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडणाऱ्या गाड्यांना परवानगी दिली जात होती. मात्र, ठाणे परिवहनच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांचे आयकार्ड तपासले जात नव्हते. उलट आम्हाला पालिका प्रशासनाकडून कोणतेच निर्देश नसल्याचे परिवहनचे कर्मचारी सांगत होते. त्यामुळे आम्ही बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थांबवत नसल्याची माहिती त्यांनी दिली. ठाण्यात रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन आणि अत्यावश्यक औषधांचा प्रचंड तुटवडा भासत असून दररोज अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शहरात एवढी विदारक स्थिती असताना देखील नागरिक आणि प्रशासन मात्र बेफिकीरपणे वागत असल्याचे भयावह चित्र समोर आले आहे. सामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन, मेट्रोचा प्रवास प्रतिबंधित केल्याने चाकरमानी बससेवेकडे वळले खरे. परंतु. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटिस येथे दिसले. 

सूचना देण्यासाठी भाेंग्याचा वापरठाण्यातील जांभळीनाका भाजी मार्केटमध्ये शुक्रवारी गर्दी होती. परंतु, प्रमाण मात्र थोडे कमी होते. सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने नागरिक त्याठिकाणी खरेदीसाठी जात होते. गुरुवारपासून लॉकडाऊन सुरू  झाले आहे. या लॉकडाऊनमध्ये लोकांनी कोरोनाचे नियम पाळावे यासाठी पोलिसांनी भोंग्यावर लोकांना सूचना देण्याची सुरुवात केली आहे. तर विनाकरण जे फिरतात त्यांच्यावर कारवाई तर पोलीस करतच आहेत, परंतु आता अशा  लोकांची ॲंटीजेन टेस्ट पोलिसांनी सुरु केली आहे. जे विनाकारण फिरताना दिसत होते, त्यांना थेट ॲंटीजेन टेस्टच्या रांगेत उभे करुन त्यांची चाचणी केली जात होती. 

स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिकाशुक्रवारी सकाळी ठाणे रेल्वेस्थानकात लॉकडाऊनचे परिणाम दिसून आले. रेल्वे पोलीस भोंग्यावर प्रवाशी वर्गाला सूचना देत होते. विनाकारण प्रवास करू नका नाहीतर कारवाई होईल, असे आवाहनदेखील पोलीस यावेळी करत होते. स्थानकात प्रवाशांसाठी वेगळी मार्गिका तयार केली आहे. तिकीट खिडकीवर प्रवाशांचे आयकार्ड चेक करून मगच त्यांना तिकीट दिले जात होते. 

वर्दळ झाली कमीशुक्रवारी रस्त्यावरील वर्दळ कमी झाल्याचे दिसत होते. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच मुभा दिली जात होती. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोलनाका याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात होती. तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई देखील केली जात होती. 

बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणमीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची पोलीस व पालिकेने आता नाक्यानाक्यावर चाचणी सुरू केली आहे. शहरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असताना दुसरीकडे बेजबाबदार नागरिक, व्यावसायिक मोकाट फिरत आहेत. त्यातच अनेक नागरिक, फेरीवाले व व्यावसायिक मास्क घालत नाहीत किंवा मास्क अर्धवट घालतात. पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. त्यातच या नागरिकांना पोलीस नाक्यांवर सुरू केलेल्या पालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रात नेऊन त्यांची कोरोना चाचणी करायला लावत आहेत. अहवाल पॉझिटिव्ह येताच त्या व्यक्तीला थेट अलगीकरण किंवा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जात आहे. त्यामुळे बेशिस्त व बेजबाबदार नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या