शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

बालकांच्या २५ टक्के आरक्षणातील प्रवेशाच्या ठाणे जिल्ह्यात दहा हजार जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:55 IST

दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले

ठळक मुद्दे शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत.पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न

ठाणे : मोठमोठ्या रकमेच्या देणग्या देऊन बालकांचे प्रवेश श्रीमंत पालकांकडून घेतले जातात. या महागड्या पण दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये देखील आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलींसाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवून मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा राखिव आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे सहा हजार २९१ जागांवर प्रवेश निश्चित केले. तिस-या फेरी अखेरच्या या प्रवेशानंतर देखील जिल्ह्याभरात अजून दहा हजार २५५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी दोन दिवसात चौथ्या फेरीव्दारे प्रवेश देण्याचे प्रयत्न आहेत.           प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश मिळत आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या १६ हजार ५४६ जागा आरक्षित आहेत. त्यापैकी दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. तिस-या फेरीव्दारे निवड केलेल्या ९३९ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ १५० विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहेत. संबंधीत शाळांमध्ये हे प्रवेश झाले आहेत. मात्र त्यांनी आॅनलाईन अपडेट अजून केले नाहीत. पण आगामी दोन दिवसात या प्रवेशांचे अपडेट व पुन्हा चौथ्या फेरीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची निवड होईल, असा दावा शिक्षण विभागाव्दारे करण्यात आला.              आधीच्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवड केलेल्यापैकी प्लेगृपसाठी दहा विद्यार्थ्यांचे प्रवेश आहेत. तर प्रीकेजीच्या वर्गासाठी २२६ विद्यार्थी, ज्यु.के.जी.साठी ३१६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले आहेत. याप्रमाणेच सीकेजीच्या वर्गासाठी चार विद्यार्थी आणि पहिलीच्या वर्गा करीता ३८३ विद्यार्थ्यांना या तिस-या फेरीव्दारे दिल्याचे नियोजन आहेत. पाल्याचे प्रवेश वेळेत घेण्यासाठी पालकांना सतत सांगितले जात असल्याचे सांगितले जात आहेत. पण विविध कागदपत्रांसह अन्य तृटींच्या कारणाखाली संबंधीत बालकांच्या पाल्याना प्रवेश देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या बालकांची संख्या कमी दिसून येत आहेत.** जागा रिक्त असूनही विद्यार्थ्यास दूरवरून यावे लागण्याच्या कारणाखाली काही शाळा विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारात आहेत. तर काही विविध कागदपत्रे, आधारकार्ड आदींच्या त्रृटी काढून प्रवेश नाकारले जात आहेत. पालकांना चांगले वागणून न देता अपमानीत करण्याचा देखील प्रयत्न काही शाळांमध्ये होत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आहेत. शाळेतील साहित्य , गणवेश, स्कूल बस प्रवास आदीं शुल्कांबाबत देखील पालक व शाळांमध्ये शाब्दीक चकमकी होत असल्यामुळे प्रवेश रखडले जात आहेत. तर काहींकडे मोबाईल नसल्यामुळे निवड झाल्याचा निरोप वेळेत न मिळाल्याची समस्या देखील या आरटीई प्रवेशात ऐकायला मिळत आहे.

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा