शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

क्लस्टरच्या रहिवाशांचे म्हाडाच्या योजनेत तात्पुरते पुनर्वसन - राधाकृष्ण विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:12 IST

ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे.

ठाणे : ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे. परंतु, ती राबवत असताना येथील रहिवाशांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात म्हाडा आणि विविध योजनांमध्ये केल्यास ही योजना लवकरात लवकर मार्गी लागू शकेल. तसेच परवडणारी घरांची योजनाही मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून या योजनांमध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक आयोजिली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.गुरुवारी त्यांनी ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाण्यात म्हाडा, एसआरएअंतर्गत विविध योजना सुरू असून परवडणाऱ्या घरांची योजनाही राबवली जात आहे. तसेच म्हाडाच्या काही प्लॉटची मागणी महापालिका आयुक्तांकडून झाली आहे. त्यानुसार, यासंदर्भात पत्र देण्याच्या सूचना त्यांना केल्याचेही त्यांनी सांगितले. आता या सर्वांवर तोडगा काढून या योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.क्लस्टर योजनेला गती द्यायची असेल, तर या योजनेतील रहिवाशांचे म्हाडा किंवा इतर योजनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केल्यास ती लवकर मार्गी लागेल. त्यानुसार, म्हाडामध्ये कशा पद्धतीने ते करता येईल, याचीही चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.>विधानसभा निवडणुकीपूर्वी क्लस्टरचा नारळ वाढविणारठाणे शहरात सध्या सहा विभागांत क्लस्टरचा सर्व्हे जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. त्यानुसार, मागील कित्येक वर्षे रखडलेला या योजनेचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढविला जाईल, असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या योजनेतील लीजचा जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे, तो न्यायालयाशी निगडित असल्याने त्यावरदेखील तोडगा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.>शिवसेनेचामोर्चा योग्यचशिवसेनेने पीकविमा कंपन्याविरोधात काढलेल्या मोर्चाचे समर्थन करून विखे-पाटील यांनी या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या कंपन्यांवर दबाव आणण्याची गरजही होतीच, त्यामुळे शिवसेनेने जे केले ते योग्यच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आता मागील साडेचार वर्षांत विविध योजनांचा लाभ झाला आहे. यापूर्वी मी विरोधी बाकावर होतो, त्यावेळेस ज्या काही मागण्या केल्या त्या भाजप सरकारने साडेचार वर्षांत पूर्ण केल्या आहेत.>राज्याचे गृहनिर्माणमंत्री थेट ठाणे महाालिका आयुक्तांच्या दारी आल्याने साºयांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्र्यांची ही भेट शासकीय होती की खासगी याबाबत आता ठाण्यात विविध एसआरए, क्लस्टर योजनांच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील