शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

क्लस्टरच्या रहिवाशांचे म्हाडाच्या योजनेत तात्पुरते पुनर्वसन - राधाकृष्ण विखे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 01:12 IST

ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे.

ठाणे : ठाण्याचा विकास हा झपाट्याने होत असून क्लस्टरसारखी योजना येथे सुरू होत आहे. परंतु, ती राबवत असताना येथील रहिवाशांचे पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात म्हाडा आणि विविध योजनांमध्ये केल्यास ही योजना लवकरात लवकर मार्गी लागू शकेल. तसेच परवडणारी घरांची योजनाही मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून या योजनांमध्ये ज्या काही त्रुटी असतील, त्या दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात एक बैठक आयोजिली असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.गुरुवारी त्यांनी ठाणे महापालिकेत आयुक्त संजीव जयस्वाल यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाण्यात म्हाडा, एसआरएअंतर्गत विविध योजना सुरू असून परवडणाऱ्या घरांची योजनाही राबवली जात आहे. तसेच म्हाडाच्या काही प्लॉटची मागणी महापालिका आयुक्तांकडून झाली आहे. त्यानुसार, यासंदर्भात पत्र देण्याच्या सूचना त्यांना केल्याचेही त्यांनी सांगितले. आता या सर्वांवर तोडगा काढून या योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.क्लस्टर योजनेला गती द्यायची असेल, तर या योजनेतील रहिवाशांचे म्हाडा किंवा इतर योजनांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन केल्यास ती लवकर मार्गी लागेल. त्यानुसार, म्हाडामध्ये कशा पद्धतीने ते करता येईल, याचीही चर्चा केली जाणार असल्याचे ते म्हणाले.>विधानसभा निवडणुकीपूर्वी क्लस्टरचा नारळ वाढविणारठाणे शहरात सध्या सहा विभागांत क्लस्टरचा सर्व्हे जवळजवळ पूर्णत्वास आला आहे. त्यानुसार, मागील कित्येक वर्षे रखडलेला या योजनेचा नारळ येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढविला जाईल, असे आश्वासन यावेळी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. या योजनेतील लीजचा जो काही प्रश्न उपस्थित झाला आहे, तो न्यायालयाशी निगडित असल्याने त्यावरदेखील तोडगा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.>शिवसेनेचामोर्चा योग्यचशिवसेनेने पीकविमा कंपन्याविरोधात काढलेल्या मोर्चाचे समर्थन करून विखे-पाटील यांनी या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. या कंपन्यांवर दबाव आणण्याची गरजही होतीच, त्यामुळे शिवसेनेने जे केले ते योग्यच होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना आता मागील साडेचार वर्षांत विविध योजनांचा लाभ झाला आहे. यापूर्वी मी विरोधी बाकावर होतो, त्यावेळेस ज्या काही मागण्या केल्या त्या भाजप सरकारने साडेचार वर्षांत पूर्ण केल्या आहेत.>राज्याचे गृहनिर्माणमंत्री थेट ठाणे महाालिका आयुक्तांच्या दारी आल्याने साºयांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मंत्र्यांची ही भेट शासकीय होती की खासगी याबाबत आता ठाण्यात विविध एसआरए, क्लस्टर योजनांच्या पार्श्वभूमीवर उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील