शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण तीन वर्षांनंतर बोलू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 15:55 IST

दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे .

- धीरज परब 

मीरारोड - दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आपली वाचा गमावून बसलेल्या १९ वर्षीय तरुणावर अवघड पण यशस्वी अशी शस्त्रक्रिया केल्याने तीन वर्षा नंतर तो बोलू लागला आहे . 

सिल्वासा येथे राहणारा मनीष हा २०१५ साली दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता . वडील देवूभाई  हे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत असल्याने मनीष कडून सर्वाना अपेक्षा होत्या . पण दहावीत नापास झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनीष ने एसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला .  त्यावेळी त्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला पण त्याची वाचा कायमची गेली होती व तो बोलू शकत नव्हता. 

 

सिलवासा  येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये आयोजित एका मोफत वैद्यकीय तपासणी दरम्यान वोक्हार्ट रुग्णालयाच्या कान  नाक व घशाच्या तज्ञ डॉ. नीपा वेलीमुट्टम यांची भेट झाली असता त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाची व्यथा सांगितली.  

 

डॉ निपा यांनी त्यांना मीरा रोडच्या वोक्हार्ट रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला. वोक्हार्ट मध्ये आल्यावर मनीषच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्याच्यावर शल्यचिकित्सा करण्याचे ठरविले. " ऍसिडमुळे मनीषच्या  श्वासनलिकेला दुखापत झाली होती व ती अरुंद बनली होती त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी  अडथळा येत होता.  सिलवासा येथील डॉक्टरांनी  ट्राचेओस्टोमी  करून श्वसनासाठी त्यांच्या मानेला एक छिद्र केले होते, या प्रक्रियेमुळे तो श्वास घेऊ शकत होता पण त्याला बोलण्यास अडथळा येत होता.  

याबाबत  वोक्हार्टचे कर्करोग तज्ञ  डॉ. कृथार्थ ठाकर व भूलतज्ञ  डॉ. विनिता संगई यांच्याशी वैद्यकीय सल्ला मसलत  करून मनीषच्या श्वासनलिकेवर  शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. या शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या श्वासनलिकेचा  खराब झालेला  भाग काढून तो पूर्ववत जोडण्यात आला.  त्यामुळे त्याच्या स्वर नलिकेला  ऑक्सिजन मिळाल्यामुळे तो परत  बोलू लागला. 

अशा प्रकारची शल्यचिकीत्सा हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात कठीण शल्यचिकित्सा समजली जाते  व त्यासाठी आधुनिक वैद्यकिय तंत्रज्ञान  उपलब्ध असणे फार गरजेचे असते असे  डॉ. नीपा वेलीमुट्टम म्हणाल्या .   भारतामध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरीही त्यांची व्याप्ती तळागाळातील लोकांपर्यंत तितकी पोहचत नसल्याचे त्या म्हणाल्या . केंद्रशासनाच्या संजीवनी योजनेतून हि शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले .  

मनीषच्या समस्येचे निराकरण कदाचित २ वर्षांपूर्वीच झाले असते परंतु  सिलवासा येथे आधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या उपचारास विलंब लागला, परंतु आता मनीष बोलू शकतो याचा आम्हाला  आनंद आहे असे मत मनीषचे  वडील देवूभाई यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :Healthआरोग्यdocterडॉक्टरnewsबातम्याscienceविज्ञान