शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

शिक्षकांनी दिले सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:37 IST

गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती.

- स्नेहा पावसकरठाणे : चांगले गुण मिळवणं, हे आज प्रत्येकाचं ध्येय आहे, पण त्याचसोबत कुतूहल वाढवणारं आणि सर्वांगीण विकास करणारं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षकांनी अशाच प्रकारचे शिक्षण दिले. आम्ही जे घडलो, त्यात शिक्षकांचे सर्वाधिक योगदान आहे, असे मत व्यक्त केले आहे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञडॉ. अनिल काकोडकर यांनी.गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती. - डॉ़ अनिल काकोडकरशालेय शिक्षणातहीआईच माझी पहिली गुरूमध्य प्रदेशातील खरबोन या लहानशा गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. मध्य प्रदेशात सर्वत्र हिंदी शाळा होत्या. परंतु, आम्ही राहत होतो, त्या गावात साधारण २०० मराठी कुटुंबं राहत होती. माझ्या आईने माँटेसरी स्कूलचा कोर्स केलेला होता. त्या गावात आईने मराठी माध्यमाची माँटेसरी सुरू केली. त्यामुळे शालेय शिक्षणातही माझी आई हीच माझी पहिली गुरू ठरली.शिक्षकांनीच सांगितलं, पुन्हा ट्युशनचं नाव काढू नकोसमी साधारण आठवी-नववीला होतो. अभ्यासात मी हुशार होतोच, पण दहावीला चांगले गुण मिळावे, या हेतूने आईने मला ट्युशनला जाण्यास सुचवले. आमच्या शाळेतीलच काही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांचे ट्युशन घेत असत. मीही बुद्धिवंत सरांकडे ट्युशनसाठी गेलो. पहिल्याच दिवशी त्यांनी मला, ‘तू इथे का आलास?’ असे विचारले.‘ट्युशन या पास होण्याची खात्री नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तू तर हुशार आहेस, फक्त मेहनत कर. काही अडचण असेल तर मला कधीही, कुठेही शंका विचार, पण पुन्हा ट्युशनचं नाव नको काढूस’, असं सांगितलं. शिक्षण हा तेव्हा धंदा नव्हता, हे नक्की.मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतून झाले शिक्षणप्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मात्र, गावाबाहेर पडले की, हिंदीच भाषा वापरली जायची. त्यामुळे माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले, तेव्हा भाषेची अडचण वाटली नाही. तर, हिंदी माध्यमात शिकताना पुस्तकात इंग्रजी परिभाषा म्हणून दिलेली असे. त्यामुळे महाविद्यालयात इंग्रजीतून शिक्षण घेतानाही भाषेचा अडसर आला नाही. तिन्ही भाषांतून माझे शिक्षण झाले आणि मी त्या भाषांसोबत नेहमी कम्फर्टेबल होतो.सरांचं ‘ते’ वाक्य स्मरणात राहिलंमी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्गात सर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, इंजिनीअरिंगमध्ये नॉलेज इज टेन (१०) पर्सेंट अ‍ॅण्ड नाइंटी (९०) पर्सेंट कॉमनसेन्स आहे, असे सांगितले. त्यांचे हे वाक्य कायम स्मरणात राहिले. शैक्षणिक प्रवासासह खऱ्या आयुष्यातही ते लागू पडते.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनthaneठाणे