शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शिक्षकांनी दिले सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:37 IST

गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती.

- स्नेहा पावसकरठाणे : चांगले गुण मिळवणं, हे आज प्रत्येकाचं ध्येय आहे, पण त्याचसोबत कुतूहल वाढवणारं आणि सर्वांगीण विकास करणारं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षकांनी अशाच प्रकारचे शिक्षण दिले. आम्ही जे घडलो, त्यात शिक्षकांचे सर्वाधिक योगदान आहे, असे मत व्यक्त केले आहे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञडॉ. अनिल काकोडकर यांनी.गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती. - डॉ़ अनिल काकोडकरशालेय शिक्षणातहीआईच माझी पहिली गुरूमध्य प्रदेशातील खरबोन या लहानशा गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. मध्य प्रदेशात सर्वत्र हिंदी शाळा होत्या. परंतु, आम्ही राहत होतो, त्या गावात साधारण २०० मराठी कुटुंबं राहत होती. माझ्या आईने माँटेसरी स्कूलचा कोर्स केलेला होता. त्या गावात आईने मराठी माध्यमाची माँटेसरी सुरू केली. त्यामुळे शालेय शिक्षणातही माझी आई हीच माझी पहिली गुरू ठरली.शिक्षकांनीच सांगितलं, पुन्हा ट्युशनचं नाव काढू नकोसमी साधारण आठवी-नववीला होतो. अभ्यासात मी हुशार होतोच, पण दहावीला चांगले गुण मिळावे, या हेतूने आईने मला ट्युशनला जाण्यास सुचवले. आमच्या शाळेतीलच काही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांचे ट्युशन घेत असत. मीही बुद्धिवंत सरांकडे ट्युशनसाठी गेलो. पहिल्याच दिवशी त्यांनी मला, ‘तू इथे का आलास?’ असे विचारले.‘ट्युशन या पास होण्याची खात्री नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तू तर हुशार आहेस, फक्त मेहनत कर. काही अडचण असेल तर मला कधीही, कुठेही शंका विचार, पण पुन्हा ट्युशनचं नाव नको काढूस’, असं सांगितलं. शिक्षण हा तेव्हा धंदा नव्हता, हे नक्की.मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतून झाले शिक्षणप्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मात्र, गावाबाहेर पडले की, हिंदीच भाषा वापरली जायची. त्यामुळे माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले, तेव्हा भाषेची अडचण वाटली नाही. तर, हिंदी माध्यमात शिकताना पुस्तकात इंग्रजी परिभाषा म्हणून दिलेली असे. त्यामुळे महाविद्यालयात इंग्रजीतून शिक्षण घेतानाही भाषेचा अडसर आला नाही. तिन्ही भाषांतून माझे शिक्षण झाले आणि मी त्या भाषांसोबत नेहमी कम्फर्टेबल होतो.सरांचं ‘ते’ वाक्य स्मरणात राहिलंमी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्गात सर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, इंजिनीअरिंगमध्ये नॉलेज इज टेन (१०) पर्सेंट अ‍ॅण्ड नाइंटी (९०) पर्सेंट कॉमनसेन्स आहे, असे सांगितले. त्यांचे हे वाक्य कायम स्मरणात राहिले. शैक्षणिक प्रवासासह खऱ्या आयुष्यातही ते लागू पडते.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनthaneठाणे