शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता होणार रद्द; शिक्षकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:19 IST

राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शिक्षकांना या निर्णयाने दिलासा मिळाला असून, त्यांना शासनाने दिवाळीपूर्वीच ही भेट दिली आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांचा समावेश होता. पालघरच्याही बहुतांश शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. या बदल्या शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. मात्र त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नसल्याने कौटुंबिक अडचणी वाढल्या. इतर कारणांमुळेही शिक्षकांनी बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्यासाठी ग्राम विकास विभागाने सुधारित धोरण हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्या रद्दकरण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.ज्या शिक्षकाना आंतरजिल्हा बदल्या नको आहेत, अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये विविध अटी व शर्तींवर कायम ठेवण्याचे आदेश आहेत. दिवाळीच्या दीर्घ सुट्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये पाठविण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत.शिक्षकांना मूळ जिल्ह्यात जाण्यासाठीच्या अटी व शर्तीसंबंधित शिक्षकास अद्याप कार्यमुक्त केलेले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त करू नये. त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश सीईओ यांनी काढावेत.कार्यमुक्त केलेले असल्यास वा त्यांना आंतरजिल्हा बदली नको असल्यास, त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जावयाचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे गरजेचे आहे.संबंधित शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्षे त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचाअधिकार राहणार नाही.शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधित होणार नाही.

टॅग्स :Teacherशिक्षक