शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

सुविधा नसताना करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:54 IST

भाईंदर पालिका : नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण, योजनेचा नाही पत्ता

भाईंदर : मीरा- भाईंदर महापालिकेच्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेचे काम भाईंदरमधील मुख्य नागरी वस्तीत अजून झालेलेच नसताना दुसरीकडे ग्रामीण भागात तर ही योजनाच नाही. तरीही आठ वर्ष महापालिका मात्र नागरिकांकडून मलप्रवाह सुविधा कर वसुली करत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यातच ग्रामीण भागात तर मालमत्ता करापेक्षा नव्याने लादलेले घनकचरा शुल्क व घरांची पालिकेने चालवलेली मोजणी या विरोधात नागरिकांच्या बैठका सुरु झाल्या आहेत.मीरा- भार्इंदर महापालिकेने भूमिगत गटार योजनेसाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ५० टक्के अनुदान मिळवले. परंतु रखडलेली ही योजना भ्रष्टाचार , गैरप्रकारांच्या आरोपांनी गाजली. या योजनेत मुर्धा, राई, मोर्वा, उत्तन, चौक, पाली, डोंगरी तसेच काशिमीरा महामार्ग परिसरातील गावांचा समावेश नसला तरी त्यांच्याकडून २०११ पासून पालिका तब्बल ८ टक्के इतका मलप्रवाह या ग्रामस्थांकडून वसुल करत आली आहे.ग्रामीण भागात भूमिगत गटार योजना नसतानाच दुसरीकडे भार्इंदर पूर्व व पश्चिम भागातही आजतागायत या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. पूर्वेला नवघर मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, महात्मा फुले मार्ग, फाटक मार्ग तसेच नवघर, खारी, गोडदेव गावांमध्ये आजही या योजनेचे काम झालेले नाही. पश्चिमेलाही भार्इंदर गावासह परिसरात तीच स्थिती आहे. तरीही या भागातील नागरिकांकडून पालिकेने गेल्या आठ वर्षांपासून मलप्रवाह सुविधा कराची वसुली चालवली आहे.भूमिगत गटार योजनेची सुविधा नसताना पालिकेने नागरिकांकडून कोट्यवधी उकळले असतानाच आता घनकचरा शुल्काची आकारणी पालिकेने चालवली आहे. प्रती घरास महिना ५० रूपयेप्रमाणे यंदाच्यावर्षी पालिकेने ९ महिन्याचे ४५० रूपये नागरिकांना त्यांच्या मालमत्ता करात समाविष्ट करुन पाठवले आहे. पुढील वर्षापासून ते १२ महिन्यानुसार ६०० रूपये वसूल केले जाणार असून त्यात काही टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. घनकचरा शुल्काच्या आकारणी मुळे मुर्धा ते उत्तन - चौक तसेच काशिमीरा व अन्य गावांसह झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करापेक्षा घनकचरा शुल्काची रक्कम काही पटींनी जास्त आहे.उत्तन परिसरात सुविधा नसताना पालिका वसूल करत असलेला मलप्रवाह सुविधा कर रद्द करण्यासह अवास्तव आकारलेला घनकचरा शुल्क कर रद्द करण्याची मागणी नागरिकांनी चालवली आहे. उत्तन परिसरातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून धावगी डोंगरावर चाललेल्या बेकायदा डम्पिंगमुळे त्रासली असताना येथील नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसुलीची लाज सत्ताधारी व प्रशासनाला वाटत नाही का ? असा सवाल धारावी बेट बचाव समितीचे संदीप बुरकेन यांनी केला आहे.बेकायदा डम्पिंगमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला असून शेतजमीन नापीक झाली तर विहिरीचे पाणीही प्रदूषित झालेले आहे. त्यातच घनकचरा शुल्काची अवास्तव आकारणी म्हणजे ग्रामस्थांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे बुरकेन म्हणाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मलप्रवाह सुविधा कर रद्द करु असे दिलेले अश्वासन आमच्या विद्यमान आमदारांनी पाळले नसल्याने नागरिकांची फसवणूक केली गेल्याचे ते म्हणाले.दुसरीकडे, आगरी समाज एकता संस्थेच्या वतीने राई, मोर्वा, मुर्धा गावांमध्येही भूमिगत गटार योजनेची सुविधा नसताना आठ वर्षांपासून पालिकेने ग्रामस्थां कडून चालवलेली मलप्रवाह सुविधा कराची मनमानी वसुली, घरांची खाजगी ठेकेदारामार्फत सुरू केलेली मोजणी आणि आता अवास्तव आकारलेल्या घनकचरा शुल्काच्या विरोधात बैठका सुरू झाल्या आहेत.प्रसंगी आंदोलन करण्याचा दिला इशारामहापालिका नागरिकांकून अवस्ताव कर वसुली करते पण त्यातून नागरिकांना फायदा मिळण्याऐवजी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच नागरिकांच्या पैशांवर मजा मारत आपले खिसे भरत असल्याची टीका संस्थेचे सचिव अ‍ॅड. सुशांत पाटील यांनी केली आहे. या विरोधात वेळ पडल्यास आंदोलन करु असा इशारा संस्थचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे, संजोग पाटील, दीपेश म्हात्रे आदींनी दिला आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक