शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

तानसा-मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 01:00 IST

भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यातदेखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात दिलासादायक वाढ झाली आहे. यात मोडकसागर १०० टक्के भरून वाहू लागले आहे. त्यापाठोपाठ आता तानसा आणि मध्य वैतरणा या दोन्ही धरणांतील पाणीसाठा ९० टक्क्यांच्यावर गेला आहे. तसेच भातसा आणि बारवी धरणांतील पाणीसाठ्यातदेखील मोठी वाढ झाल्याने सर्वत्र दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.ठाणे जिल्ह्यात पावसाचा सुरू असलेला लपंडाव, त्यात धरणक्षेत्रात दिलेली ओढ यामुळे धरणांच्या पाणीपातळीत होत असलेली घट यामुळे मुंबईसह ठाणे जिल्हावासीयांना भविष्यात पाणीचिंता भेडसावणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, मागील आठ ते दहा दिवसांत शहरी, ग्रामीण भागांसह धरणांच्या क्षेत्रातदेखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने हे चित्र पूर्णत: बदलले आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण मंगळवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे.ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे त्यातील पाणीसाठा ७७.८८ टक्क्यांवर पोहोचला.तर, भातसा धरणातील पाणीसाठा ८७.८४ टक्के इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यात असलेल्या मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठादेखील ९१.७१ टक्क्यांवर गेला आहे. तसेच तानसा धरणातील पाणीसाठ्याचीही ९२.१८ टक्के इतकी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाने या धरणांच्या क्षेत्रात असेच बरसणे सुरू ठेवल्यास ही धरणेदेखील लवकरच भरून वाहण्यास सुरुवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Damधरण