शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

वरसावे वाहतूक पुलाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर पलटला, वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:48 IST

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला. टँकरमधील गॅस गळती होऊ लागल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खंडित करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.एलपीजी गॅसने भरलेला टँकर मुंबई-अहमदाबाद मार्गावर पलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या अपघातात सुदैवाने त्याच्या आसपास कोणतीही वाहने तसेच माणसे नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु टँकरमधील गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमनचे अधिकारी, उपायुक्त व जवानांसह फायर व वॉटर गाड्या काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरात मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करून टँकर व गळती झालेल्या गॅसवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. 

उपायुक्तांनी घटनेची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीला दिल्यानंतर कंपनीने एका रिकाम्या टँकरसह विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. दीड तासानंतर नवीन वरसावे खाडी पुलावरुन प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू केली. दरम्यान या दुर्घटनेमुळे घोडबंदर मार्गासह, वसई-विरार व मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील महामार्ग क्र. ८ वर प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत कदम यांनी स्वत: उपस्थित राहून तेथील घटनेवर नियंत्रण ठेवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.वरसावे पुलावरच्या वाहतुकीच्या मार्गात केला बदलठाणे ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकांना वरसोवा मार्गे न जाण्याचा आवाहन केलं आहे. तसेच मुंबईहून गुजरातला जाणा-या मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडून काशिमीरा मार्गे गुजरातकडे जाणारे वाहन नाशिक रोडहून भिवंडी मार्गे गुजरात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच ठाणे घोडबंदरकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहन नाशिक हायवे-भिवंडीमार्गे गुजरातला जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ठाण्याहून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनाही मुलुंड - घाटकोपर मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वाहन चालकांना हे आवाहन केलं आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर