शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

वरसावे वाहतूक पुलाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर पलटला, वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:48 IST

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला. टँकरमधील गॅस गळती होऊ लागल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खंडित करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.एलपीजी गॅसने भरलेला टँकर मुंबई-अहमदाबाद मार्गावर पलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या अपघातात सुदैवाने त्याच्या आसपास कोणतीही वाहने तसेच माणसे नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु टँकरमधील गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमनचे अधिकारी, उपायुक्त व जवानांसह फायर व वॉटर गाड्या काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरात मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करून टँकर व गळती झालेल्या गॅसवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. 

उपायुक्तांनी घटनेची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीला दिल्यानंतर कंपनीने एका रिकाम्या टँकरसह विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. दीड तासानंतर नवीन वरसावे खाडी पुलावरुन प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू केली. दरम्यान या दुर्घटनेमुळे घोडबंदर मार्गासह, वसई-विरार व मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील महामार्ग क्र. ८ वर प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत कदम यांनी स्वत: उपस्थित राहून तेथील घटनेवर नियंत्रण ठेवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.वरसावे पुलावरच्या वाहतुकीच्या मार्गात केला बदलठाणे ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकांना वरसोवा मार्गे न जाण्याचा आवाहन केलं आहे. तसेच मुंबईहून गुजरातला जाणा-या मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडून काशिमीरा मार्गे गुजरातकडे जाणारे वाहन नाशिक रोडहून भिवंडी मार्गे गुजरात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच ठाणे घोडबंदरकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहन नाशिक हायवे-भिवंडीमार्गे गुजरातला जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ठाण्याहून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनाही मुलुंड - घाटकोपर मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वाहन चालकांना हे आवाहन केलं आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर