शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा मग सत्तेचे दावे करा; भाजपाचे शिवसेनेला आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 20:31 IST

Pratap sarnaik, Geeta jain: आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आला नाही . पालिकेत सत्ता आणण्याचे दावे करण्या आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा. राज्यात तुमची सत्ता आहे ना , मग कोणी भ्रष्टाचार केला याची लावा चौकशी असे थेट आव्हानच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी शिवसेनेला दिले आहे . 

 

आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती . त्यावेळी आ. सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपाने मोठा भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप करत त्यांनी बीएसयुपी योजना कामाची निविदा , उद्याने आदी देखभालीसाठी ठेक्याने देण्याचे  काम, परिवहन ठेक्यातील गैरप्रकार आदींची उदाहरणे त्यांनी दिली होती . तर आ. गीता जैन यांनी शहरात एका व्यक्तीचा विकास झाला असा आरोप करत भाजपाला शहरात चांगली लोकं नको आहेत असे सांगत टीकेची झोड उठवली होती . 

 

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते . म्हात्रे यांनी आ . गीता जैन यांच्यावर टीकेची उडवली . गीता जैन ह्या भाजपच्या महापौर होत्या त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का ? त्या म्हणतात भाजपाच्या सत्ता काळात विकास झाला नाही मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लिटर पाणी योजनेचे उदघाटन झाले , सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला आदी विकास कामे झाली नाहीत का ? असे सवाल म्हात्रे यांनी केले . 

 

राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हणून त्या पुन्हा भाजपा सोबत आल्या होत्या आणि प्रदेश नेतृत्वाशी संपर्कात होत्या . स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही . त्या भाजपा सोबत होत्या म्हणतात तर महापौर निवडणुकीत अक्षाच्या विरोधात मतदान कसे केले ? त्यांच्या सोबत एकही नगरसेवक शिवसेनेत गेला नसून अश्विन कसोदरिया , विजय राय यांनी सभापती निवडणुकीत भाजपलाच मतदान केले आहे . तर अन्य कार्यकर्ते देखील मला भेटून बोलले कि आम्ही भाजपा सोबतच आहोत . 

 

शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे गेली १५ वर्षे आमदार आहेत . गेल्या १५ वर्षांचा त्यांचा रेकॉर्ड पाहता ते नुसते बोलतात . कोणी भ्रष्टाचार केला ? किती रकमेचा झाला ? कोणत्या खात्यात झाला ? . त्यांनी एकही भ्रष्टाचार सिद्ध केलेला नाही .  उंटावरून शेळ्या हाकत फालतूचे आरोप करायची सरनाईकांची सवय आहे .  आता राज्यात तुमची सत्ता आहे . मग चौकशी  लावा . जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना सजा व्हावी असे आमचेपण म्हणणे आहे असे म्हात्रे म्हणाले .   

 

सरनाईक गेली १५ वर्ष आमदार असून देखील त्यांना पालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्याचे सोडाच सत्तेच्या जवळ देखील पोहचता आले नाही . आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा  . आत्ताच्या सभापती निवडणुकीला देखील सेनेच्या नगरसेविका दीप्ती भट गैरहजर होत्या . सेनेचे अनेक आजीमाजी नगरसेवक , पदाधिकारी भाजपात आले आहेत . आणखी देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. सरनाईक हे शिवसेनेची सत्ता आणण्याचे पोकळ दावे गेल्या १५ वर्षां पासून करत आले आहेत असा टोला म्हात्रे यांनी लगावला . 

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकारण सोडल्याचे जाहीर केले आहे. त्यांना समाजसेवा करायची असल्याने ते महापालिकेत येतात व महापौर, आयुक्तांना भेटत असतात असे भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर