शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'नुकसानभरपाई, कर्जमाफीसाठी लवकर कार्यवाही करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 10:26 PM

अन्यथा आंदोलनाचा इशारा; भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

मोखाडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकाºयांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाºयांनी शनिवारी ही पाहणी केली. मुळातच या भागात खरीप हंगामा व्यतिरीक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने, येथील शेतकºयांची उपासमार होणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नरेगाची कामे सुरू करावीत. त्याचबरोबर पीककर्ज माफ करावे आणि नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. सवरा यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाºयांची भेट घेऊन, मंत्रालय स्तरावर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी भाजपचे पालघर उपाध्यक्ष संतोष चोथे, युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष उमेश येलमामे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांनी मांडल्या व्यथामोखाड्यातील अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या करोळ, वावळ्याची वाडी, पाचघर तसेच खोडाळा येथील आदिवासी शेतकºयांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.