शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

स्वरसम्राज्ञी ! लतादीदींचं 92 व्या वर्षात होतंय पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 14:50 IST

कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीप कुमारने नकळतपणे का होईना पण ^^^‘मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बूं आती है...’ असे म्हटले नसते तर... आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर.

- प्रसाद पाठक

आपल्यावर होणारी टीका ही आपल्याला संपवणारी नाही, तर आपल्यात नसलेल्या गुणाला ओळखून, ती भरून काढून, सर्वोच्च अढळ स्थानी झेप घेण्यासाठी सुसंधी आहे, हे ज्याला कळते तो यशाच्या शिखरावर निश्चयाने पोहोचू शकतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गानकोकिळालता मंगेशकर. संपूर्ण जगाच्या लाडक्या लतादीदी. २८ सप्टेंबर त्यांचा जन्मदिन. त्या ९२व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने स्वरसम्राज्ञीच्या गायनप्रवासावर टाकलेला दृष्टिक्षेप.कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या काळात दिलीप कुमारने नकळतपणे का होईना पण ^^^‘मराठी लोगों के उच्चारण में दाल-चावल की बूं आती है...’ असे म्हटले नसते तर... आणि त्या टिप्पणीला लतादीदींनी मनावर जिद्दीने कोरून ठेवले नसते तर... तर आज लता मंगेशकर ज्या उंचीवर आहेत तेथे नसत्या. जिद्दी तर त्या होत्याच, हट्टी, ठामही होत्या. आजही तशाच आहेत. आपल्याला काय साध्य करायचे आहे त्या विचारावर त्यांचे लक्ष केंद्रित होते. प्रसंगी नाते, मैत्री, संबंधही त्यांनी आड येऊ दिले नाहीत. मग समोर प्रत्यक्ष त्यांची सख्खी बहीण असो, संगीतकार सचिनदा असो वा मोहम्मद रफी असो... किंवा निर्माता दिग्दर्शक राज कपूर! आपल्या भूमिकेत व विचारावर त्या ठाम राहिल्या. काही काळ अबोला सहन करूनही. कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना आपल्या अंगी असलेल्या कलेला व्यावसायिक पातळीवर आणावे लागले; पण तसे आणतानाही सुरांशी, स्वरांशी, संगीतकलेशी तडजोड, प्रतारणा कधीच केली नाही. उलट आपण अपेक्षा करतो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिकच मिळाल्याचे समाधान त्यांनी संगीतकारांना दिले आणि पर्यायाने आनंदही रसिकांना दिला. अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या संगीत रचनांना लता मंगेशकर यांच्या स्वरांच्या परिसस्पर्शाने अजरामर केले आहे.

शास्त्रीय संगीत श्रेष्ठ आणि चित्रपट संगीत कनिष्ठ असा विचार करणाऱ्या तसेच ‘लताचे शास्त्रीय संगीतातील योगदान काय,’ असा प्रश्न विचारणाºया लोकांनी लतादीदींची शास्त्रीय संगीतावर आधारित असंख्य गीते ऐकावीत. शास्त्रीय संगीत सामान्य माणसाच्या मनात रुजवण्यात लता स्वरांचे मोठेच योगदान आहे. केवळ एकच उदाहरण देतो. १९५७ साली आलेला सुवर्ण सुंदरी चित्रपट, संगीतकार पी. आदीनारायण राव, गाणे, ‘कुहू कुहू बोले कोयलिया...’ आजही हे गाणे सर्व गानरसिकांना प्रिय आहे आणि प्रत्येक ऋतूचे वर्णन करणारे असल्यामुळे तसेच शास्त्रीय संगीत रसिकांच्या आवडीच्या ‘सोहनी’ रागावर आधारित असल्याने सार्वकालिक सर्वप्रिय पुन्हा पुन्हा ऐकले जाणारे आहे.

शास्त्रीय राग आधारित रचना केवळ शास्त्रीय रचना आहेत किंवा बुजुर्ग संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत म्हणून गाजल्या नाहीत तर शास्त्रीय संगीताला केवळ तीन-चार मिनिटांच्या अतिशय कमी अवधीत तेवढ्याच ताकदीने त्या वेळच्या रेकॉर्डिंग पद्धतीनुसार (अत्याधुनिक रेकॉर्डिंग नाही) पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करून अतिशय उत्कट अशी साभिनय भावना त्यात प्रकट करून पार्श्वगायनात अढळपदी टिकून राहणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. चित्रपट क्षेत्र, मुख्यत्वे अमराठी लोकांचे स्थान अधिक बळकट असताना, तसेच चित्रपटसृष्टीतील संगीत गायन या संबंधित कोणत्याही लेखात जी मोजकी मराठी नावे समाविष्ट केल्यावाचून तो लेख इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही त्या नावांमध्ये लता मंगेशकर यांचे नाव सर्वांत आघाडीवर असेल यात तिळमात्रही शंका नाही. लता मंगेशकर या मराठी व्यक्तीने, कलाकाराने, एका कर्तृत्ववान स्त्रीने जगाला नोंद घ्यावीच लागेल एवढे महान कार्य केले आहे.

(लेखक संगीतप्रेमी आणि जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.)

 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकर