शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सुरजला व्हायचेय सनदी अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:10 IST

समतोल फाउंडेशनकडून पळून आलेल्या सात मुलांची घरवापसी

ठाणे : कर्नाटकातील बेल्लारी गावातील नऊ वर्षांचा सुरज थोटे घर सोडून आला आणि चुकीच्या ट्रेनमध्ये बसला. मी मुंबईत आलो, बाहेर फिरत असताना ‘समतोल’चे कार्यकर्ते मला भेटले. त्यांनी मला लातूरला शिकायला पाठविले. मग मला बालस्नेहालयात पाठविण्यात आले. आधी मला फक्त कन्नड येत होती. इथे आल्यावर मी हिंदी, मराठी या दोन्ही भाषा शिकलो. मला ठाणे महापालिकेच्या शाळेत आठवीला असताना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले. आता ब्राह्मण विद्यालयात शिकत असून मला आयएएस व्हायचे आहे, असे थोटे याने सांगताच प्रेक्षकांनी सुरजकरिता टाळ्यांचा कडकडाट करीत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.कुणी घरातले रागवल्याने, कुणी कामाच्या शोधात तर कुणी शिकायचे म्हणून अशा विविध कारणांनी घरातून निघून आलेल्या मुलांना शनिवारी त्यांच्या पालकांकडे हस्तांतरित करण्यात आले. काही महिने किंवा वर्ष घरापासून दूर राहिलेली ही मुले आपल्या आईला, बहिणीला, आजीला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडत होती. आमचे हरवलेले मूल आम्हाला सुखरूप मिळाले, या भावनेने त्यांच्या पालकांच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू झरत होते.समतोल फाउंडेशन आणि स्ट्रीट चिल्ड्रन फाउंडेशन आयोजित मन:परिवर्तन शिबिर समारोप कार्यक्रम शनिवारी मराठी ग्रंथसंग्रहालय येथे झाला. रेल्वेस्थानकावर भटकत असलेल्या या मुलांचे आज त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले. सात मुलांना शनिवारी त्यांच्या पालकांसोबत घरी पाठविले. आईवडील नसलेला आणि आजी सांभाळ करीत असलेला जालन्याचा अमोल कमाणे म्हणाला की, विहिरीत उडी मारली म्हणून भावाने मारल्याचा राग मनात धरून मी घर सोडले. मला माझी चूक उमजली. आता मी माझ्या आजीला सोडून जाणार नाही, असे सांगत त्याने आपल्या आजीला घट्ट मिठी मारली. कल्याण, म्हारळचा युवराज गोरे म्हणाला की, मला घरात मारले म्हणून घरातून पळून आलो होतो. मात्र, ती माझी चूक होती. कसारा, पाटीलवाडीतील करण वीर म्हणाला की, माझे वडील गवंडी काम करतात. मी त्यांच्यासोबत काम करावे, ही त्यांची इच्छा असली तरी मला शाळा शिकायची होती. कामाच्या शोधात मुंबईकडे धाव घेतली. आता घरी जाऊन शिकणार असल्याचे तो म्हणाला.आपल्याला अनेकदा प्रवासात, रस्त्यात, स्टेशनवर अनेक लहान मुले दिसतात. मात्र, ती कोणाची तरी मुले असतात, ही बाब लक्षात घेऊन या मुलांविषयी संवेदनशील होण्याची गरज आहे, असे मत राज्य बालआयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी व्यक्त केले. मुले ही राष्ट्रीय संपत्ती असून, ते चुकीच्या मार्गाकडे वळू नये, याकरिता त्यांना दिशा देण्याचे काम समतोल फाउंडेशन करीत आहे. आजकाल पालक आणि मुलांचा संवाद होत नाही. शिक्षणासोबत संस्कार होणे आवश्यक असते. त्यामुळे या मुलांवर संस्कार करण्याचे काम समतोल करत असल्याचे आ. संजय केळकर यांनी सांगितले. ‘स्लम डॉग मिलेनिअर’ या चित्रपटाचे साउंड डायरेक्टर रेसुल पुकुट्टी म्हणाले की, मुले घर सोडून येतात, त्याचे कारण त्या मुलांमध्ये नसून आपल्यात, समाजात आहे. आपण त्यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे म्हणाले की, ठाण्यात अनेक श्रीमंत सोसायट्या आहेत, त्या सहज पैसे खर्च करतात. परंतु, समतोलच्या कामाला पैशांची अत्यंत गरज असून या श्रीमंतांनी आपल्या काळजाचा कोपरा या मुलांसाठी ठेवावा. यावेळी त्यांनी ग.दि. माडगूळकर यांचे ‘एक धागा सुखाचा’ हे गीत सादर केले. दरम्यान, दृष्टिहीन मुलांच्या वाद्यवृंदाचा संगीतमय कार्यक्रम झाला. यावेळी ‘समतोल’चे संस्थापक विजय जाधव, विश्वस्त एस. हरिहरन, संकल्प शाळेचे संचालक राज परब, शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती परब, साक्षी परब उपस्थित होते.समतोल फाउंडेशन आणि आरती नेमाणे हे या मुलांच्या कहाण्या ‘लोकमत’ या वृत्तपत्रातून लिहीत असून त्यांचे लवकरच पुस्तक प्रकाशित करण्यात येणार असल्याचे व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी जाहीर केले. आज ‘हरवलेलं मुक्काम पोस्ट’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.