शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सुप्रीम कंपनीने केला सर्व आरोपांचा इन्कार

By admin | Updated: January 3, 2017 05:29 IST

भिवंडी-मनोर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तिच्यावर स्थानिकांनी व काही नेत्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यासह इन्कार केला आहे.

वाडा : भिवंडी-मनोर या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तिच्यावर स्थानिकांनी व काही नेत्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्व आरोपांचा पुराव्यासह इन्कार केला आहे. सुप्रीम समूहातील सुप्रीम मनोर, वाडा, भिवंडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडने या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम २०१० मध्ये सुरू केले. त्याची लांबी ६४.३२० कि.मी. होती. त्यातच वनविभागाचे क्षेत्र येत असल्याने व त्यात काम करण्यास वनविभागाने अनुमती नाकारली आहे. तसेच विश्वभारती फाट्यापासून ते पुढे भिवंडी शहरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला स्थानिकांनी विरोध केला त्यामुळे ही कामे अपूर्ण आहेत. वास्तविक ही कामे पूर्ण करण्यास कंपनी तयार असतांनाही या दोन बाबींमुळे ती होऊ शकलेली नाहीत. रिलायन्स, एअरटेल, महावितरण यांच्या केबलसाठी रस्ते खोदले गेले आहेत दोन वर्षातील अतिवृष्टीमुळे रस्त्यांची हानी झाली आहे.या रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनीचे संपादन केले त्यांना तिचा मोबदला रेडी रेकनरनुसार दिला आहे. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकल्पबाधित भूधारकाची मोबदला मिळालेला नाही अशी लेखी तक्रार कंपनीकडे नाही. या महामार्गाचे बरेचसे काम स्थानिक उपकंत्राटदार नेमून सुप्रीमने करवून घेतलेले आहे. त्यासाठी या उपकंत्राटदाराने वापरलेल्या गौण खनिजापोटी शासकीय दराने आवश्यक ती रॉयल्टी शासनाकडे भरलेली असून त्याच्या पावत्याही कंपनीकडे आहेत. तसेच त्या महसूल खात्याकडेही आहेत. त्याचा विचार न करता तक्रारीत केलेल्या आरोपांचा ढोबळ विचार करून कंपनीकडून स्वामीत्वधन वसुलीचा आदेश महसूल अधिकाऱ्यांनी दिला आहे. म्हणूनच कंपनी मुंबई हायकोर्टात त्या विरोधात धाव घेती झाली आहे. याबाबतच्या याचिकेवर माननीय न्यायालयाने महसूल अधिकाऱ्यांना कंपनीची बाजू ऐकून घेतल्याशिवाय याबाबत कोणताही आदेश देऊ नये अथवा कारवाई करू नये असे आदेश दिलेले आहेत, असे कंपनीच्या प्रशासकीय महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)