शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अग्निशमनच्या विलंबामुळे रौद्ररूप, कंपनीमालकाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:06 AM

कंपनीमालकाचा आरोप : आगीत १५० कोटींचे नुकसान, उत्पादन जपान येथे निर्यात होते

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ या कंपनीला मंगळवारी लागलेली आग सुरुवातीला कमी होती. कंपनीतील आगप्रतिबंधक यंत्रणेद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर पाऊ ण तासानंतर त्यांची पहिली गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या विलंबामुळेच आग वाढल्याचा आरोप या कंपनीचे मालक राजीव सेठ यांनी बुधवारी केला.सेठ म्हणाले की, अग्निशमन दलाची पहिली गाडी आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र बंबातील पाणीच संपले. त्यामुळे त्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यानंतर दुसरी गाडी आली तरी यंत्रणा कामाला लागण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीत सुमारे ५०० हून अधिक कामगार काम करतात. तीन पाळ्यांमध्ये काम चालत असून येथील उत्पादन जपान व इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. २५ वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीत सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या आगीमध्ये कंपनीचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले.

स्टोअर रूममधील कच्चा माल, साधनसामग्री याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. तसेच आगीमागचे कारणही शोधले जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. त्यातून नेमके कारण उघड होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या स्टोअर विभागातील कामगाराने सांगितले की, कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी वेल्डिंग सुरू होते. काही गडबड होऊ न ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने आगीविषयी हाच अंदाज वर्तवण्यात आला होता.आगीची माहिती मिळताच पलावा, एमआयडीसी केंद्रातून अग्निशमनच्या गाड्या, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला जो वेळ लागला तोच. मात्र, अग्निशमनच्या विलंबामुळे आग वाढली, असे म्हणणे चुकीचे आहे. मी स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो. आमचे अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी झटत होते.- दिलीप गुंड, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी