शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 2:39 AM

आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावल्याप्रकरणी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

ठाणे : कांबा-वाघेरापाडा, ता. कल्याण येथील आदिवासी शेतकऱ्यांची शेकडो एकर शेतजमीन उल्हासनगर येथील व्यापारी व विकासकांनी बनावट शेतकरी दाखल्यांद्वारे हडपल्याचा आरोप आहे. यावरील कारवाईत हलगर्जी केल्यामुळे राजस्थान येथील महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती (एससी-एसटी) आयोगाने समन्स बजावल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.आदिवासींच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जमीन बळकावल्याप्रकरणी लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, त्यावर ठोस कारवाई न केल्यामुळे परिहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी आदिवासी शेतकरी विठ्ठल शिद, बाळाराम शिद यांची बाजू मांडली आहे. याची दखल घेऊन आयोगाने राजस्थानच्या महसूल विभागाचे सचिव, सिरोहीचे जिल्हाधिकारी यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांना ‘समन्स’ बजावून १२ जुलै रोजी नवी दिल्ली येथे सुनावणीसाठी हजर होण्याचे आदेश जारी केले आहेत. आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन सुनावणी लावल्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.कांबा-वाघेरापाडा येथील स.नं. ४७/१, ४७/२, १०८/३ १२१/१ आदी शेतजमीन उल्हासनगर येथील व्यापारी बिल्डर प्रकाश बुधरानी, नीशा बुधरानी, शीतल बुधरानी, गिरीश बुधरानी, विशाल बुधरानी यांनी राजस्थान राज्यातील शिवगंज, सिरोही, गाव ‘मनाधर’ येथील शेतकरी असल्याचा बोगस दाखला सादर करून खरेदी केल्याचा दावा केला आहे. याविरोधात तक्रार दाखल करूनही फेरफार नोंदी केल्याची मनमानीदेखील प्रशासनाने केली आहे. याशिवाय, याप्रकरणी कल्याण न्यायालयातदेखील प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कल्याण तहसीलदारांनी या जमीनप्रकरणी गंभीर बाब आहे, असा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठवलेले आहे. दरम्यान, बुधरानीसह शांतिलाल पोरिया, अश्विनीकुमार शहा आणि जमीनमालक विष्णू फडके यांच्या वारसाविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. या कालावधीतच प्रशासनाने फेरफार नोंदवण्याची मनमानी केल्याचा आदिवासी शेतकºयांचा आरोप आहे.जमीन तिस-या व्यक्तीला विकण्याची चलाखीया शेकडो एकर जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रकाश बुधरानी यांनी स.नं. १०८/३, १२०/१, १२१/१ ही जमीन योगेश नारायण देशमुख यांना विकल्याचा आरोपही शेतकºयांनी केला आहे.न्यायप्रविष्ट या जमीन प्रकरणात तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी या दोषी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत करून विधानसभेतील लक्षवेधी सूचनेलादेखील उलटसुलट उत्तरे दिल्याचा आरोप आहे.यानंतरच्या वेळोवेळी झालेल्या चौकशीनंतरही देशमुख यांनी ही जमीन तिसºया म्हणजे गुणवंत प्रेमराज भंगाळे, नरेश भाटिया आणि नोतदास तनवाणी यांना विकून फेरफार नोंदणी केल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. या जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे.नियमाविरोधात शिफारसी करण्यात आल्या असून परवानगीदेखील ज्या अटीशर्तींनुसार देण्यात आली आहे. तिचे पालन होताना दिसत नसल्याचे गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणे