शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

ठाण्यात उलगडला सुमन कल्याणपूर यांचा जीवनपट

By admin | Updated: October 13, 2015 01:50 IST

स्वरानंद प्रस्तुत तसेच लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ उपक्रमांतर्गत सुमनसुगंध हा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी काशिनाथ घाणेकर येथे संपन्न झाला.

ठाणे : स्वरानंद प्रस्तुत तसेच लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ उपक्रमांतर्गत सुमनसुगंध हा कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी काशिनाथ घाणेकर येथे संपन्न झाला. या वेळी निवेदिका मंगला खाडिलकर यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना बोलते करून त्यांच्या सांगीतिक जीवनाचा प्रवास उलगडला.अखियाँ मिला के, जवा है मोहब्बत हसी है जमाना, यासारख्या गाण्यांचा प्रभाव असणाऱ्या सुमनतार्इंनी वयाच्या १३-१४ व्या वर्षी कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. केशव भोळे यांच्याकडून संगीताचे ज्ञान घेतलेल्या सुमनतार्इंनी ८० दशकातील काळ गाजवला.स्वराबरोबर भाव आणि शब्दांचाही संगम होत असतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी जिथे सागरा धरणी मिळते, ना तुम हमे जानो ना हम तुमे जाने, आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे है जबानपर आदी गाण्यांची झलक रसिक प्रेक्षकांना ऐकवली. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या नाम संस्थेला कार्यक्रमामधून संकलित झालेला निधी संस्थेचे सदस्य सचिन पाटेकर यांच्याकडे देण्यात आला. या वेळी लोकमतचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते सुमन कल्याणपूर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला स्वरानंद संस्थेचे हर्षदा शिंदे, स्वरा शिंदे, संदीप शिंदे तसेच अनुदान प्रॉपर्टीजच्या सुनीता शिंदे, नतेश शिंदे, सुब्रह्मण्यम शिंदे आणि अथर्व एंटरटेन्मेंटचे प्रसाद कारूळकर यांचा हातभार लागला. माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करंदीकर यांनी सुमनतार्इंनी गायलेली बहारदार गाणी सादर केली. शिक्षण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या वकील शरद चिटणीस, परशुराम राऊत या ठाणेकरांचा सुमन कल्याणपूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)