शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वक्तृत्व स्पर्धेत सुजाता चव्हाण यांना प्रथम पारितोषिक; साडेचार वर्षीय आर्वीच्या वक्तृत्वाने जिंकली रसिकांची मने 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 26, 2022 17:03 IST

वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली.

ठाणे: अभिनय कट्ट्यावर वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सुजाता चव्हाण यांनी पटकावला. या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले ते आर्वी चोरगे या साडेचार वर्षाच्या मुलीचे वक्तृत्व. तिने शिवाजी महाराजांची औरंगजेबाच्या तावडीतून सुटका या विषयावरील भाषण सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.

वक्तृत्व स्पर्धेत अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धक निवडले गेले होते. त्यांनी ऑनलाइन शिक्षण, छत्रपती शिवाजी महाराज , किल्ले रायगड, भारत माझा देश आहे आणि अशी ही ज्ञानेश्वरी या विषयांवर प्रभावी भाषणे केली. ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्पर्धकांसाठी खुली होती. सर्वप्रथम सोनाली हिंगे यांनी आणि त्यानंतर आयुष राऊत या मुलाने ऑनलाइन शिक्षण या विषयावर, तर आयुष धोत्रेने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर भाषण केले. कीर्ती खांडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणातील एक प्रसंग उपस्थित श्रोत्यांसमोर ओघवत्या पद्धतीने सादर केला. 

सुजाता चव्हाण आणि मंजुषा पाटील यांनी अतिशय ओघवत्या पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाचे फायदे आणि तोटे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. स्मिता तोरस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे असामान्य कर्तृत्व हा विषय या स्पर्धेसाठी निवडला होता. विहान चव्हाण, मोहन पानसरे आणि मुक्ता भानुशाली यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांवरील भाषण अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले. स्पर्धेत द्वितीय पारितोषिक विहान चव्हाण याने तर तृतीय पुरस्कार कीर्ती खांडे आणि मोहनपानसरे यांनी विभागून देण्यात आले. सोनाली हिंगे यांना विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. 

स्पर्धेसाठी सुप्रसिद्ध साहित्यिक र. म. शेजवलकर आणि अभिनेते दिग्दर्शक राजन मयेकर यांनी परीक्षण केले. त्याचबरोबर उपस्थित प्रेक्षकांसोबत निकाल जाहीर होण्यापूर्वी सुसंवाद ही साधला. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद समाधानकारक असून भविष्यात चांगले वक्ते घडवण्याच्या दृष्टीने व समाजातील विविध विषयांचा अभ्यास व्हावा याकरिता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन किरण नाकती यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले होते असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय चव्हाण यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणे