शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

ठाण्यात कामगाराची आत्महत्या: मृत्यु दाखल्यासाठी पोलिसांना करावी लागली नऊ तासांची भटकंती

By जितेंद्र कालेकर | Updated: April 23, 2020 00:33 IST

केवळ काही ठराविक नियमांवर बोट ठेवत एखाद्या सामान्य नागरिकाला तिष्ठत ठेवणे हे सरकारी कार्यालयांमधून अनेकदा पहायला मिळते. असाच अनुभव आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीला आणि कापूरबावडी पोलिसांना नुकताच आला. या कामगाराच्या मृत्युच्या दाखल्यासाठी आणि शवविच्छेदनासाठी तब्बल नऊ तासांची भटकंती करावी लागण्याची वेळ पोलिसांवर आली. संवेदनाहहिन यंत्रणेचा हा फटका गेल्या तीन दिवसांमध्ये दोन कुटूंबियांना बसल्यामुळे सखेद संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे दोन दिवसांमधील तिसरी घटना संवेदनाहिन यंत्रणेचा नातेवाईक आणि पोलिसांनाही फटका

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे: घरातील कौटूंबिक कलहातून राजू विजय रेड्डी (४५, रा. गजानन रहिवासी चाळ, मानपाडा, ठाणे) याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. पंचनाम्यानंतर त्याच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कापूरबावडी पोलिसांना चक्क नऊ तासांची भटकंती करावी लागली. अखेर मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.राजू रेड्डी याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर २१ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्याने मानपाडा येथील घरातील छताच्या हुकाला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेतल्याचे आढळले. त्याचा मृतदेह थेट ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून पोलिसांनी ८.३० वाजता नेला. मात्र, हे कोरोनासाठीच्या रुग्णांसाठी असल्यामुळे याठिकाणी शवविच्छेदन होणार नाही आणि त्यामुळे मृत्युच्या कारणाचा दाखलाही देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रुग्णवाहिकाही रुग्णालयाच्या बाहेरच थोपविण्यात आली. तिथून नातेवाईक आणि मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन पोलीस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेले. तिथे मृतदेह आत घेण्यात आला. पण मृतदेहाच्या शवविच्छेदनास त्यांनी नकार दिला. तसेच पालिका आयुक्तांचे आदेश असून हद्दीचे कारण दाखवत तेथील डॉक्टरांनी शवविच्छेदनाला नकार दिला. ज्याचा मृत्यु झाला त्याची ४० वर्षीय पत्नी आणि तीन मुले आहेत. मोलमजूरी करणारे हे कुटूंब असून त्यांना कोणाचाही आधार नाही. रुग्णवाहिकेचा खर्चही पोलिसांनी पदरमोड करुन केला, असेही या पोलिसांनी तेथील डॉक्टरांना सांगितले. पण तरीही या शवविच्छेदनाला तेथील डॉक्टरांनी नकार दिला. हे सर्व करण्यासाठी कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाºयाला जिल्हा रुग्णालय ते कळवा रुग्णालय असे तीन ते चार वेळा हेलपाटे मारावे लागले. या सर्व लालफितीमध्ये मरणानंतरही राजू रेड्डी या कामगाराचा मृतदेह रुग्णवाहिकेतच ताटकळला होता. अखेर एका नगरसेवकाच्या निदर्शनास ही बाब पोलिसांनी आणून दिली. या नगरसेवकाने सूत्रे हलविल्यानंतर शेवटी जिल्हा रुग्णालयाने शवविच्छेदनाला मान्यता दिली. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस बरोबर असूनही एका सामान्य महिलेला आपल्या पतीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी कोरोनामुळे भटकंती करावी लागली. एकीकडे कोरोनाला घाबरु नका पण खबरदारी घ्या असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या भीतीपोटी मृत्युनंतरही सामान्य नागरिकांना असे हाल सोसावे लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे सलग दुसºया दिवशी असाच अनुभव पोलिसांना आला आहे. सोमवारीही आकाश जाधव याच्या आत्महत्येनंतर चितळसर पोलिसांनाही मृत्युच्या दाखल्यासाठी अशीच सुमारे सहा तासांची भटकंती करावी लागली. 

‘‘ यापूर्वीही कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या वागळे इस्टेट येथील मुलीला उपचारासाठी नाकारण्यात आले होते. आता चितळसर आणि मानपाडयातील या दोन घटनांमध्येही पुन्हा हे समोर आले आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी केली जाईल. असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पालिका आयुक्तांनाही पत्रव्यवहार केला जाईल.’’अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, वागळे इस्टेट 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी