शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी सरकारी अनुदानाचा फायदा उच्च शिक्षणासाठी घ्यावा; पदवीदान कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 22:09 IST

शिक्षणासाठी विविध सरकारी अनुदान उपलब्ध असुन त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा, असा सल्ला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी गुरुवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित पदवीदान कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

भार्इंदर - शिक्षणासाठी विविध सरकारी अनुदान उपलब्ध असुन त्याचा फायदा घेत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन शैक्षणिक दर्जा वाढवावा, असा सल्ला मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त बळीराम पवार यांनी गुरुवारी येथील शंकर नारायण महाविद्यालयात आयोजित पदवीदान कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. 

पुढे बोलताना त्यांनी, आपण सर्व मध्यमवर्गीय आहोत त्यातील बहुतांशी विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ असतानाही  आर्थिक अडचणींमुळे शिक्षण घेता येत नाही. परिणामी शिक्षण अर्धवट सोडावे लागते. भविष्यात त्याचे परिणाम त्या विद्यार्थ्यांना भोगावे लागतात. भविष्यातील हा भोग दुर करण्यासाठ िविद्यार्थ्यांनी सकरारी अनुदानांचा लाभ घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  केंद्रीय लोकसेवा तसेच महाराष्टÑ लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देऊन केंद्रीय व राज्य लोकसेवेतील उच्च पदस्थ अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला. माणसांनी शिकलं पाहिजे, त्यांनी शिकलेलं आचरणात आणले पाहिजे, असे आवाहन करुन त्यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लेक वाचवा, लेक वाढवा, लेक शिकवा असा संदेश दिला. कार्यक्रमात विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय असल्याचा आनंद व्यक्त करीत त्यांनी आई नसेल तर मुलांचा जन्म होणे शक्यच नाही व त्यामुळे लेक वाचवलीच पाहिजे. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात महिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थी दशेत उच्च स्तरावर पोहोचेपर्यंत विद्यार्थ्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. मात्र त्या संघर्षाला बळी न पडता संघषार्शी सतत दोन हात करणे हे यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासह शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन केले. यावेळी शंकर नारायण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी १९९४ मध्ये सुरु झालेल्या महाविद्यालयाची यशोगाथा सांगुन आजमितीस महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी विविध शाखेत शिक्षण घेत असल्याचे समाधान व्यक्त केले. महाविद्यालयातील विविध शाखेतील एकूण ८१२ पदवी व पदयुत्तर अभ्यासक्रम पुर्ण करणाय््राा विद्यार्थ्यांना यावेळी पदवीदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव महेश म्हात्रे, माजी नगरसेविका कल्पना म्हात्रे, एमबीए शाखेचे संचालक डॉ. भूपेश राणे, विनय पाटील, प्राचार्या रंजना पाटील यांच्यासह प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकStudentविद्यार्थी