शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पहिल्या यादीवर विद्यार्थ्यांची नजर; ठाण्यातील महाविद्यालयांचाही कटआॅफ वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 2:11 AM

दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.

ठाणे : दहावीचा निकाल चांगला लागला असून त्यात ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने यंदाही अकरावीच्या प्रवेशासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. उद्या (गुरुवारी) अकरावी प्रवेशाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार असून ठाण्यातील प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ एक ते दोन टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.मुंबईप्रमाणेच ठाण्यातीलही प्रमुख महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. निकाल लागल्यावर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरताना विद्यार्थी सर्वच प्रमुख महाविद्यालयांच्या गतवर्षीच्या कटआॅफची शोधाशोध करतात आणि त्यानुसारच महाविद्यालयांना पसंतीक्रम देतात. यंदा चांगल्या निकालामुळे सर्वच महाविद्यालयांचा कटआॅफ वाढण्याची शक्यता आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाºयांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पहिल्याच लिस्टमध्ये प्रथम पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही, अशी धाकधूक आहे. वाढत्या गुणवत्तेबरोबर महाविद्यालयांच्या प्रत्येक शाखेच्या कटआॅफमध्ये वाढ होते आहे. हीच परिस्थिती यंदाही कायम राहिली, तर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी दुसºया मेरिट लिस्टवर, तर काहींना तिसºया मेरिट लिस्टपर्यंतही वाट पाहावी लागू शकते, असे मत काही प्राचार्यांनी व्यक्त केले आहे.यंदाच्या दहावीच्या निकालात ८५ ते ९५ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही प्रमुख महाविद्यालयांचा कटआॅफ किमान दोन टक्क्याने वाढणार, हे नक्की. त्यामुळे ८५ ते ९५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना तरी पहिल्याच मेरिट लिस्टमध्ये प्रथम पसंतीचे महाविद्यालय मिळण्याची शक्यता कमी आहे.- डॉ. चंद्रशेखर मराठे, प्राचार्य, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय

टॅग्स :thaneठाणे