शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विद्यार्थ्यांचा वॉटर पार्कमध्ये मृत्यु: नालासोपाऱ्याच्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 19:21 IST

ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या दिपक गुप्ता (१५) याच्या मृत्युप्रकरणी नालासोपारा येथील नवजीवन शाळेच्या मुख्यध्यापकांसह सहलीच्या आयोजक शिक्षकांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात हलगर्जी आणि निष्काळजी केल्याचा आरोप करीत दयानंद गुप्ता यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे शालेय व्यवस्थापन चांगलेच अडचणीत आले आहे.

ठळक मुद्देतुळींज पोलीस ठाण्यात केली आजोबांनी तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात प्रकरण वर्गनवजीवनचे शाळा व्यवस्थापन अडचणीत

ठाणे: नालासोपारा येथून ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये सहलीसाठी आलेल्या दिपक गुप्ता (१५) या दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यु झाला आहे. त्याच्या मृत्युस नालासोपारा येथील नवजीवन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि सहलीचे आयोजक शिक्षक जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध तुळींज पोलीस ठाण्यात दिपकचे आजोबा दयाराम गुप्ता यांनी शनिवारी तक्रार दाखल केली आहे. हा तपास आता कासारवडवली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

नवजीवन शाळेचे १३ शिक्षक हे २५० विद्यार्थ्यांना घेऊन ११ जानेवारी २०१९ रोजी ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील सूरज वॉटर पार्कमध्ये आले होते. यासाठी शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याकडून ७०० रुपये शुल्कही आकारले होते. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास अचानक गुप्ता कुटूंबियांना दिपकला एका खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले. तिथे आजोबा दयाराम यांच्यासह गुप्ता कुटूंबीय पोहचल्यानंतर त्याच्या मृत्युची खबर त्यांना रुग्णालयात समजली. त्याचा मृत्यु दुपारी १२.३० वा. च्या सुमारास सूरज वॉटर पार्कच्या पाण्यात बुडून झाला असून त्यास नवजीवन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि शैक्षणिक सहलीचे आयोजक शिक्षक तसेच इतर जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळे चंद्रकांत गुप्ता यांच्या एकूलत्या एक मुलाचा अर्थात आपल्या नातवाचा मृत्यु झाल्याचा आरोप दयाराम गुप्ता यांनी तुळींज पोलीस ठाण्यात १२ जानेवारी रोजी दिलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. एकीकडे शाळा व्यवस्थापनाने त्याचा मृत्यु हह्दयविकाराने झाल्याचे कासारवडवली पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे. तर दूसरीकडे शाळेय शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे नातवाचा बुडून मृत्यु झाल्याचा आरोप आजोबांनी केल्यामुळे शालेय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. पी. पवार हे अधिक तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू