शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

सरकारी गोदामातून २५० क्विंटल भात चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 3:15 AM

आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला मारून ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचा-यांनी दिली.

मुरबाड : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भातावर चोरट्यांनी डल्ला मारून ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिली.आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकºयांकडून हमी भावात भात खरेदी केला जातो. मुरबाड तालुक्यात माळ व धसई येथील केंद्रात भात खरेदी केला जातो. महामंडळाचे स्वत:चे गोदाम नसल्याने मिळेल त्या ठिकाणी भातखरेदीचे काटे लावले जातात. माळ केंद्रातील भातखरेदी खापरी येथे केली आहे. चार ते पाच वर्षांपासून खापरी येथे भात साठवला जातो. मागील वर्षी खरेदी केलेला भात यावर्षी उचलण्यात आल्याने रिकाम्या झालेल्या गाळ्यात चालू हंगामातील भात खरेदी करून गाळे बंद केले होते. या ठिकाणी रात्रपाळीसाठी कर्मचारी किंवा रखवालदार नसल्याने ही संधी साधून चोरट्यांनी एका गाळ्याचा दरवाजा तोडून त्यामधील अंदाजे ५०० गोण्या लंपास केल्याचे महामंडळ कर्मचाºयांनी सांगितले.या भाताचे वजन अंदाजे २५० क्विंटल असून त्याची किंमत चार लाख २५ हजार आहे. याबाबत आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात तक्र ार दिली आहे.

टॅग्स :thaneठाणे