शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

राज्य परिवहन सेवेच्या बसला विटाव्यात आग, ४० प्रवासी थोडक्यात बचावले

By जितेंद्र कालेकर | Updated: February 26, 2024 00:28 IST

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) बसला कळव्यातील विटाव्याजवळ आग लागल्याची घटना रविवारी सकाळी ८:१५ वाजता घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तातडीने आटोक्यात आणली. या घटनेत ४० ते ४५ प्रवासी बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विटावा ब्रिजजवळ कळवा वाहतूक पोलिस चौकीजवळ कोळीवाडा प्रवेशद्वारसमोर, गणपती पाडा भागात खोपट बस डेपोहून (पनवेल, खोपोली मार्गे) पालीकडे जाणारी एसटी बसचालक सचिन दीपक शंभरकर आणि वाहक विद्या मोहिते हे घेऊन जात होते. साधारण सकाळी ८:१५ वाजता बसच्या इंजिनमध्ये आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह आणि अग्निशमन दलाचे जवान एका रेस्क्यू वाहनासह दाखल झाले. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीने सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. ही आग बसमधील चालक, वाहक, स्थानिक रहिवासी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी ८ वाजून २८ वाजताच्या सुमारास पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश मिळवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :state transportएसटीAccidentअपघात