शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण आणि ठाण्यातही राज्य राखीव दलाची कुमक तैनात

By जितेंद्र कालेकर | Updated: March 31, 2020 20:38 IST

ठाणे शहरातील अनेक भागांमध्ये वारंवार आवाहन करुनही नागरिक रस्त्यावर येण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मुंब्रा परिसरात दोन दिवसांपूर्वीच राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) तुकडी तैनात केली होती. आता पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील बहुतांश भागांमध्ये एसआरपीएफची तुकडी तैनात केली आहे.

ठळक मुद्देमुंब्रा भागात पोलीस आयुक्तांनी केले नागरिकांचे प्रबोधननागरिकांनी जुमानले नाहीतर दिला कडक कारवाईचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंब्य्रापाठोपाठ आता भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर आणि राबोडी या सर्वच ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाच्या चार कंपन्या तैनात करण्याचा निर्णय ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे. मुंब्रा भागात मंगळवारी दुपारी स्वत: पोलीस आयुक्तांनी भेट देऊन नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहनही केले.राज्यात २४ मार्चपासून संचारबंदी लागू झालेली आहे. तेंव्हापासून ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांच्या परिसरामध्ये स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. अनेक ठिकाणी गृहरक्षक दलाचीही मदत घेण्यात आली आहे. तरीही बहुतांश भागांमध्ये नागरिक अगदी क्षुल्लक कारणांसाठी घराबाहेर पडत आहेत. अनेकदा घरातील किरकोळ सामान आणण्याचे तसेच घरातील व्यक्ती आजारी असल्याची कारणे दिली जात आहेत. अनेकदा केवळ फेरफटका मारण्यासाठीही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र अनेक ठिकाणच्या नाकाबंदी दरम्यान पहायला मिळत असल्याचे पोलीस सांगतात. वागळे इस्टेट, मुंब्रा आणि राबोडी या भागात वारंवार पोलिसांची गस्त असूनही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याचे आढळले. अखेर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी केलेल्या मागणीनंतर मुंब्रा भागात २९ मार्च पासून राज्य राखीव दलाची एक संपूर्ण कंपनी (एका कंपनीमध्ये तीन प्लाटून्स असतात. एका प्लाटून्समध्ये २५ ते ३० सशस्त्र पोलीसांची संख्या असते.) तैनात केली आहे. ३१ मार्च पासून भिवंडीतही एक कंपनी, उल्हासनगर आणि कल्याण या दोन शहरांसाठी एक स्वतंत्र कंपनी तर राबोडी, ठाणे शहर आणि कळवा या विभागांसाठी तीन प्लाटून्स आहेत. तसेच वागळे इस्टेटसाठी एक प्लाटून्स तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.* मुंब्रा परिसरात मंगळवारी दुपारी १२ ते २ या काळात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे आणि पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी वेगवेगळया भागात फिरुन नागरिकांचे प्रबोधन केले. प्रत्येकाने काळजी घ्या. अनावश्यक कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन यावेळी फणळकर यांनी केले. तरीही कोणी न जुमानले नाहीतर मात्र कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस