शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

'राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर; ऑनलाईन शिक्षण पद्धती बंद करण्याची मागणी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 18:10 IST

बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहे

ठळक मुद्दे बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहेसरकारला आर. टी. ई. कायद्याचा विसर पडला आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरकार ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहे का ? असा सवाल संघटनेने विचारला आहें.

भिवंडी - राज्य सरकारने कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु केली आहे. परंतु, ही पद्धत अत्यंत अन्यायकारक असून राज्य सरकारला आरटीई कायद्याचा विसर पडला आहे, अशी टिका करत ऑनलाइन शिक्षण पद्धती लवकरात लवकर बंद करावी अशी मागणी बहुजन विद्यार्थी संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने प्रांत अधिकारी भिवंडी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य सरकारने सुरु केलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या विरोधात आंदोलन करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने स्वतःची यंत्रणा उभी न करता केवळ पालकांच्या मोबाईलच्या भरवश्यावर ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. महाराष्ट्रात जिल्हा परिषद,महानगरपालिका, नगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही निम्म्यापेक्षा जास्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे गरीब घरातील आहेत. त्यातच ग्रामीण भागात वीज वारंवार खंडित होते. इंटरनेट येण्यासाठी गावाच्या वेशीवर यावे लागते. त्यातच गरीब घरातील पालकांकडे अत्यंत साधा मोबाईल फोन असतो. असलाच कोणाकडे अँड्रॉइड फोन तोही साध्या कंपनीचा असतो, अश्या बिकट परिस्थितीत सरकार ऑनलाईन शिक्षण कोणाला देणार असा प्रश्न संघटनेने शासनाला विचारला आहे.              ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा सर्वांत पुढे आहेत. मुंबई सह इतर बड्या शहरांमध्ये लाखो रुपये फी घेणाऱ्या इंग्रजी शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु केल्याने फी घेता येईल. शाळा सुरु होईपर्यंत फी घेण्याची वाट पहावी लागली तर त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार होते. म्हणून इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांच्या दबावाला बळी पडून सरकारने ही ऑनलाईन शिक्षण व्यवस्था सुरु केली आहे. असा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.          सरकारला आर. टी. ई. कायद्याचा विसर पडला आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षण सरकार ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहे का ? असा सवाल संघटनेने विचारला आहें. सदरचे निवेदन देताना बहुजन विद्यार्थी संघटनेचे राज्य महासचिव प्रदीप गायकवाड, ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन तांबे, जिल्हा उपाध्यक्ष निखिल उबाळे, जिल्हा संघटक सुशील साठे, अजिंक्य गायकवाड, भिवंडी तालुका अध्यक्ष शैलेश वाघमारे, भिवंडी शहर अध्यक्ष नितेश गायकवाड, भिवंडी शहर उपाध्यक्ष प्रकाश सपकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीSchoolशाळाEducationशिक्षण