शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

रेल्वेकडून राज्याची कोंडी; मजुरांच्या विशेष गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 01:00 IST

जेमतेम चार तास अगोदर पूर्वसूचना - प्रशासनाचा दावा

- सुरेश लोखंडे ठाणे : परप्रांतीय मजुरांना गावी सोडण्याकरिता रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्यावरून महाविकास आघाडी सरकार व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना मजुरांकरिता गाडी सोडण्यात येणार असल्याची माहिती केवळ चार तास अगोदर मिळते. त्यामुळे अल्पावधीत या रेल्वेने गावी जाणाऱ्या मजुरांची जमवाजमव करताना तारांबळ उडते, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आम्ही रेल्वेगाड्या देण्यास तयार आहोत, पण गाड्या रिकाम्या जाता कामा नये, असे रेल्वेमंत्री बजावत असले, तरी खरी मेख ही रेल्वेगाड्यांच्या ऐनवेळी दिल्या जाणाºया सूचनेत असल्याचे उघड झाले आहे. रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या प्रवृत्तीतून हे घडत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या संचारबंदीत अडकलेल्या कामगार, मजुरांना त्यांच्या राज्यांत सोडण्यासाठी रेल्वेगाड्यांची सुमारे १० ते १५ दिवस प्रशासनाला प्रतीक्षा करावी लागते. गाडी सोडण्यात येणार असल्याची सूचना जेमतेम चार तास आधी दिली जाते. संबंधित रेल्वेतून जाण्याकरिता मजूर, कामगार यांनी नोंदणी केलेली असते. परंतु, इतक्या अल्पावधीत त्यांच्यापर्यंत रेल्वेगाडी सोडण्याची सूचना पोहोचवताना जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेची तारांबळ उडते.

राज्य सरकार दररोज ८० रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी करीत आहे. मात्र, प्रत्यक्षात जेमतेम ४० रेल्वे सोडण्यात येत असल्याचे विधान मुख्यमंत्र्यांनी रविवारी केले. लागलीच रेल्वेमंत्र्यांनी पाच टिष्ट्वट करून मजुरांच्या याद्या द्या, लागलीच २०० रेल्वेगाड्या सोडतो, असे आव्हान दिले. याबाबत, काही अधिकाऱ्यांनी सांगितले की, भार्इंदरमधून मजुरांकरिता रेल्वेगाडी सोडण्याची मागणी ५ मेपासून केली गेली. प्रत्यक्षात रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय २२ मे रोजी घेण्यात आला व जेमतेम चार तास अगोदर कळवण्यात आले.

जे कामगार उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड वगैरे ठिकाणी जाण्याकरिता नोंदणी करतात, पुरावे देतात, ते रेल्वे सुटण्याकरिता नावनोंदणी केल्यावर दोन-तीन दिवस येऊन चौकशी करतात. मात्र, रेल्वे लागलीच सोडण्याची मागणी मान्य झाली नाही, तर घरी जाऊन बसतात. केवळ चार तास अगोदर सूचना मिळाल्यावर हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा राजकीय कार्यकर्त्यांच्या साहाय्याने त्यांना सूचना देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सर्वच नोंदणी केलेल्या मजूर, कामगारांपर्यंत पोहोचता येत नाही.

साहजिकच, नावनोंदणी करताना प्रवाशांची संख्या पुरेशी दिसते. मात्र, प्रत्यक्ष रेल्वे सुटताना ३० ते ४० टक्के कामगार वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असे अधिकाºयांनी सांगितले. गावी जाण्यासाठी रेल्वे सुटत नाही, हे सुरुवातीच्या पाचसहा दिवसांत लक्षात आल्यावर पुढे १५ दिवसांकरिता रेल्वेगाडीची वाट पाहण्याइतका धीर या मजूर व कामगारांमध्ये नाही. रोजीरोटी बंद झालेली असल्याने मिळेल त्या वाहनाने आपले गाव गाठण्याचा ते प्रयत्न करतात. साहजिकच, प्रवाशांची संख्या कमी होण्याचे हेही कारण आहे, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे.

चार तासांत हे सोपस्कार आटोपले जातात

रेल्वे सोडण्याची सूचना चार तास अगोदर मिळाल्यावर दोन हजार कामगार, मजुरांना शोधून काढण्याकरिता महसूल आणि पोलीस यंत्रणेला जीवाचे रान करावे लागते. रेल्वेस्थानक गाठलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांना कोरे फॉर्म देऊन ते भरून घ्यावे लागतात. अशिक्षित मजुरांना फॉर्म भरायला मदत करावी लागते. फॉर्म जमा करण्याकरिता ग्रुप लीडर नियुक्त करावे लागतात. फॉर्म जमा झाल्यावर पोलीस स्टेशननुसार मजुरांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड नंबर, त्यांचा येथील व गावचा पत्ता हे सर्व फीड करून यादी तयार करावी लागते.

प्रवासी आणावे लागतात शोधून

या यादीतील एक हजार २०० लोकांचा ग्रुप केल्यावर या प्रवाशांच्या ग्रुप लीडरला फोन करून ते नक्की येणार आहेत की नाही, याची खात्री करावी लागते. या कामगारांना स्टेशनवर आणण्यासाठी ४० बसची व्यवस्था करावी लागते. बसमध्ये मजूर बसलेले असताना रेल्वे तिकीट तसेच प्रत्येकाला एक साबण, दोन पाण्याच्या बाटल्या, दोन बिस्किटांचे पुडे, मास्क, सॅनिटायझरची बाटली, फूड पॅकेट असे कीट दिले जाते. मग, एकेका बसमधील मजुरांना रेल्वेगाडीत बसवावे लागते.

1,200 प्रवासी पूर्ण होण्यास अगदी २० प्रवासी जरी कमी असले, तरी रेल्वे स्थानक सोडत नाही. अशावेळी २० प्रवासी शोधून आणावे लागतात, असे राज्य प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेIndian Railwayभारतीय रेल्वे