शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

महामार्गाचे काम सुरू; मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 1:20 AM

अंबरनाथ शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे.

- पंकज पाटीलअंबरनाथ : शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. सोमवारी या रस्त्याचे काम सुरू झाले आहे; मात्र महामर्गाचे काम करताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच, रस्त्यासाठी खोदकाम करताना वाहतुकीने गजबजलेला रस्ता सुरक्षित करणे गरजेचे असतानाही त्याठिकाणी सुरक्षेसाठी दोरी किंवा बॅरेकेटिंग लावण्यात आलेले नाही. त्यामुळे बेसावध वाहन थेट खड्ड्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे.अंबरनाथमध्ये अडकून पडलेला कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणारा राज्य महामार्गाचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी एकत्रित काम सुरू असून अस्तित्वातील रस्ता आणि नव्याने तयार करण्यात येणारा रस्ता यांच्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे हे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स, सूचना फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे फलकच लावलेले नाहीत. विम्को नाका ते शंकर मंदिर, आयटीआयसमोरील रस्त्यांवरही अशीच स्थिती आहे. रस्त्याचे काम करीत सुरक्षेची जबाबदारी ही ठेकेदाराची असतानाही ठेकेदार या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे.सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत होते. जलवाहिनी स्थलांतरित होत नसल्याने काम करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात होते. आता ठेकेदाराने परस्पर काम सुरू करून जलवाहिनीचे काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलवाहिन्या स्थलांतरित होत नाहीत तोवर काम करता येणार नाही, असे सबब देणारे अधिकारीच आता या जलवाहिन्या काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यास रस्ता खोदण्याची वेळ येणार आहे.जलवाहिनीच्या ठिकाणी भर टाकून कामफॉरेस्ट नाका परिसरात रस्त्याच्या एक फुटावर जलवाहिनी असल्याने काँक्रीटचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्याच्यावर वाढीव माती भराव करून हा रस्ताच वर उचलण्यात येत आहे. त्यामुळे शेजारी असलेली दुकाने किंवा कंपन्या या रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. अधिकारी या अडचणी न सोडवताच रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. उल्हासनगर महापालिका, जीवनप्राधिकरण, अंबरनाथमधील एका बड्या बिल्डरची जलवाहिनी ही याच मार्गावरून गेली आहे. ती स्थलांतरित न करताच काम सुरू केले आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाthaneठाणे