शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

राज्य राखीव बलाच्या विविध मागण्यांसाठी समाजसेविकेचे दिव्यातील घरातच उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 21:22 IST

राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकृती बिघडलीउपचार घेण्यास दिला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्यात येईल, असे सांगत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांची पोलीस दलात पूर्वी २०१४ पर्यंत दहा वर्षातच बदली केली जात होती. परंतू, २०१४ नंतर ती बदली १५ वर्षे करण्यात आली. आता १५ वर्षाऐवजी ती बदली दहा वर्षे करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याच मागणीसाठी समाजसेविका अश्विनी यांनी घरातच उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची सुरु वात मार्च २०१९ पासून झाली. या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. यादरम्यान, अश्विनी यांनी मुंडन आंदोलन देखिल केले आहे. त्या किडनीच्याही आजाराने ग्रस्त आहेत. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, १३ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. श्वास घेण्यास त्यांना त्रास झाला होता. तेंव्हा मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या दिवा येथील घरी जाऊन त्यांना सायंकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले. त्यांची तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले. जर माझ्या जिवाला काही झाले तर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, २०१९ मध्ये आश्वासन देणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील, असे आंदोलनकर्त्या अश्विनी यांनी म्हटले आहे.‘‘ एसआरपीएफमध्ये आमचे कोणीही नाही. परंतू, ज्या पद्धतीने या जवानांना हालाखीचे जीवन जगावे लागते. त्यावरुन त्यांच्यासाठी आमचा हा लढा सुरु आहे. सहा - सहा महिने हे जवान गडचिरोलीसारख्या नक्षली भागात कुटूंबापासून लांब असतात. त्यामुळेच जिल्हा बदलीचा नियम पूर्वीप्रमाणेच १५ ऐवजी दहा वर्षे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. ’’अमोल केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते तथा उपोषणकर्त्या अश्विनी यांचे पती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक