शहरं
Join us  
Trending Stories
1
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
2
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
3
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
4
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
5
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
6
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
7
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
8
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बंगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
9
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
10
चांदी झाली 'सोनेरी'! २ लाख रुपये किलोचा टप्पा पार, पण गुंतवणुकीपूर्वी 'हा' भयानक इतिहास वाचा
11
इम्रान खानचा काटा काढायला असीम मुनीरचा खतरनाक प्लॅन; देशद्रोहाचा खटला चालवला जाणार?
12
मनरेगाचं नाव बदलणार, मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता; जाणून घ्या, काय असणार नवं नाव?
13
John Cena Last Match: अवघ्या WWE चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळणार...! जॉन सीना निवृत्त होतोय, रविवारी शेवटचा सामना....
14
HDFC Bank UPI Downtime: HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस ४ तासांसाठी राहणार बंद, पाहा कधी आणि कोणत्या वेळी राहणार बंद
15
T20 Cricket: टी-२० क्रिकेटमध्ये भारताने कोणत्या संघाविरुद्ध गमावले सर्वाधिक सामने? वाचा
16
'मंत्र्यावर बिबटे सोडा', उद्या पाकिस्तानातील लोक मंत्री म्हणून येतील', सुधीर मुनगंटीवारांचा विधानसभेत पारा चढला!
17
"फेमस व्हायचंय..."; एडल्ट स्टार होण्याचं भलतंच वेड, व्हायरल केला पत्नीसोबतचा खासगी व्हिडीओ
18
Travel : मनालीपासून २० किलोमीटरवर आहे स्वर्गासारखे सुंदर दिसणारे 'हे' ठिकाण! हिमवृष्टी बघून प्रेमात पडाल
19
“कुणबी प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, GR काढून ३ महिने झाले, पण…”; मनोज जरांगे सरकारवर नाराज
20
SMAT 2025 : टीम इंडियातून बाहेर काढलं त्यानं हॅटट्रिकसह पुण्याचं मैदान गाजवलं, पण... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

राज्य राखीव बलाच्या विविध मागण्यांसाठी समाजसेविकेचे दिव्यातील घरातच उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 21:22 IST

राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकृती बिघडलीउपचार घेण्यास दिला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: राज्य राखीव बलाच्या जवानांची जिल्हा बदली १५ वर्षांऐवजी दहा वर्षे करावी, या मागणीसाठी राहत्या घरीच गेल्या २० दिवसांपासून दिवा येथील समाजसेविका अश्विनी केंद्रे यांनी उपोषण सुरु केले आहे. शनिवारी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्यात येईल, असे सांगत त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.राज्य राखीव पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांची पोलीस दलात पूर्वी २०१४ पर्यंत दहा वर्षातच बदली केली जात होती. परंतू, २०१४ नंतर ती बदली १५ वर्षे करण्यात आली. आता १५ वर्षाऐवजी ती बदली दहा वर्षे करावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे. याच मागणीसाठी समाजसेविका अश्विनी यांनी घरातच उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची सुरु वात मार्च २०१९ पासून झाली. या आंदोलनासाठी त्यांनी मुंबई ते ठाणे शासकीय कार्यालयांबाहेर देखील आंदोलन केले होते. यादरम्यान, अश्विनी यांनी मुंडन आंदोलन देखिल केले आहे. त्या किडनीच्याही आजाराने ग्रस्त आहेत. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, १३ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. श्वास घेण्यास त्यांना त्रास झाला होता. तेंव्हा मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या दिवा येथील घरी जाऊन त्यांना सायंकाळी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात दाखल केले. त्यांची तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. आपल्या मागणीची शासन दरबारी दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी उपचारासही नकार दिला. अखेर घरीच त्यांना आॅक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याचे त्यांचे पती अमोल केंद्रे यांनी सांगितले. जर माझ्या जिवाला काही झाले तर याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, २०१९ मध्ये आश्वासन देणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार असतील, असे आंदोलनकर्त्या अश्विनी यांनी म्हटले आहे.‘‘ एसआरपीएफमध्ये आमचे कोणीही नाही. परंतू, ज्या पद्धतीने या जवानांना हालाखीचे जीवन जगावे लागते. त्यावरुन त्यांच्यासाठी आमचा हा लढा सुरु आहे. सहा - सहा महिने हे जवान गडचिरोलीसारख्या नक्षली भागात कुटूंबापासून लांब असतात. त्यामुळेच जिल्हा बदलीचा नियम पूर्वीप्रमाणेच १५ ऐवजी दहा वर्षे करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. ’’अमोल केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते तथा उपोषणकर्त्या अश्विनी यांचे पती.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSocialसामाजिक