शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

सोशल मीडियावरील लाईक हा कलेचा प्रतिसाद नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:30 IST

सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये.

ठाणे : सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये. एखाद्या कलाकृतीला जास्त लाईक्स मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे, असे समजू नका. अनेक जण लाईक करतात. पण त्यातील मजकूरही त्यांनी वाचलेला नसतो, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी मांडले.कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे आयोजित व्यंगचित्रकार संमेलनात सोशल मीडिया आणि व्यंगचित्रे या परिसंवादात ते बोलत होते. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडित, महेंद्र भावसार, गणेश जोशी, ‘लोकमत’च्या पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी आदी मान्यवर यात सहभागी झाले होते.बोधनकर म्हणाले, सोशल मीडियाचा वापर मी गेली पाच वर्षे करत आहे. हे एक प्रभावशाली माध्यम आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. सोशल मीडियामुळे घराघरात बातमी लगेच पोहोचते. त्यासाठी दुसºया दिवशीच्या वृत्तपत्राची आपण वाट पाहत नाही. समाजाला व्यंगचित्र कळत नाही, असे जर कलावंताला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. समाज कलावंताची परीक्षा घेत असतो.चित्रकारांनीही स्वत:च स्वत: चे परीक्षण केले पाहिजे. दुसºयांनी चुका दाखवून देण्याची वेळ येऊ नये. व्यंगचित्र लपविले तर ओळी कळणार नाही आणि ओळी लपविल्या तर व्यंगचित्र कळणार नाही. ही व्यंगचित्राची खरी ताकद आहे. अशाप्रकारची व्यंगचित्रे कलावंतानी काढली पाहिजे. व्यंगचित्रकारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत संचार करावा म्हणजे त्यांची व्याप्ती वाढेल, असे त्यांनी सांगितले.चारूहास पंडित म्हणाले, सध्या चांगले कार्टुनिस्ट राहिले नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मीडियाजवळ कार्टुनिस्टकडे बघण्याचा डोळा नाही. या काळातही चांगले कार्टुनिस्ट तयार होत आहेत. आताच्या काळात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमेच चांगले होते किंवा लोकमान्य टिळकांचे अग्रलेख चांगले होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कार्टुनिस्टमध्येही वेगळे प्रवाह येतात. आपले व्यंगचित्र कोण पाहते, हे समजून घेतले तर त्यातून जास्त सुस्पष्टता येईल. कलावंतालाही अपग्रेड होता येईल. एखाद्या व्यंगचित्राला १५ लाख लोकांनी लाईक केले तर त्यांचा आर्थिक उपयोग काय? असे वाटेल. पण त्या लोकांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. वृत्तपत्राच्या तुलनेत सोशल मीडियाला लिमिटेशन नसतात. फेसबुक, युट्युुबपुरता आता सोशल मीडिया मर्यादित राहिलेला नाही. इन्स्टाग्राम, ट्विटर अशी अनेक माध्यमे आहेत. त्यातूनही अर्थाजन करता येऊ शकते. सोशल मीडिया हे व्यंगचित्रकारांसाठी वृत्तपत्रांच्या पुढचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.प्रशांत कुलकर्णी म्हणाले, एखाद्या कलावंताला मासिकात किंवा वृत्तपत्रात व्यंगचित्र छापण्याची संधी मिळते. एखाद्याला ती मिळत नाही. पण सोशल मीडियावर प्रत्येकाला संधी मिळतेच. माझ्या व्यंगचित्रात काय त्रुटी आहेत, हे सांगणारे संपादक मला माझ्या सुदैवाने मला भेटले. सोशल मीडियात व्यंगचित्र प्रसिध्द करताना एक ज्येष्ठ व्यक्ती संपर्कात हवी. जी आपल्याला त्रुटी सांगू शकतील. ही एक त्रुटी सोडली तर हे माध्यम अफाट आहे. आपल्या व्यंगचित्रामुळे दंगली व्हाव्यात, असे कोणत्याही व्यंगचित्रकाराला वाटणार नाही. एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात. त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. पण बहिष्कार टाकणे योग्य नाही. आपला देश , समाजाचे भान राखल्यास सोशल मीडियासारखे माध्यम नाही, असे त्यांनी सांगितले.गणेश जोशी म्हणाले, प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया, तेथील वाचक कोणत्या भाषेचा आहे याच काय त्या मर्यादा असतात.जर चित्र काढताना शब्दाची गरजच नसेल, तर ते कोणत्याही विषयावर असले तरी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून त्यावर रिप्लाय येतो. त्यांचा न्यायनिवाडा लगेच होतो. तुम्ही चुकीचे मांडले तर त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटतात. कार्टुनवर नेत्याला काही वाटत नाही. पण कार्यकर्ता विभागला गेला आहे. त्यांच्यात मतभेद दिसून येतात.कोणता रंग वापरायचा, असा प्रश्न हल्ली निर्माण होतो. कलावंताला सगळे रंग सारखे असतात. पण आपल्याकडचे रंगही जाती-धर्मात विभागले गेले आहेत. कट्टरवाद, धार्मिक, जातीयवाद यांचा फटका तुम्हाला नक्की बसतो. कोणाच्या भावना दुखवल्यास माफीही मागता आली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.कैलास म्हापदी यांनी सांगितले, सोशल मीडियाचे मूळ प्रिंट मीडियात आहे. व्यंगचित्रकारांनी चित्राचा दर्जा सुधारण्यासाठी रोजची वृत्तपत्रे वाचली पाहिजेत. लोक समजून घेतले पाहिजेत. वृत्तपत्रांचे वाचन केले नाही तर चित्रे बोन्सायसारखी होतील. बदलत्या जमान्याबरोबर चित्रकारांनीही बदलले पाहिजे. नंदकुमार टेणी म्हणाले, ज्यांच्यामुळे कॅरेक्टर सुचतील अशा व्यक्ती माझ्या काळात होत्या याबद्दल बाळासाहेब ठाकरे स्वत:ला भाग्यवान समजत. व्यंगचित्रकारांची रेषा, डौल चांगला हवा. कार्टुनिस्टला व्यंग नेमके पकडता यायला हवे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया