शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

सोशल मीडियावरील लाईक हा कलेचा प्रतिसाद नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:30 IST

सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये.

ठाणे : सोशल मीडियामुळे व्यंगचित्रकारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेला प्रतिसाद हा लाईक्समध्ये मोजू नये. एखाद्या कलाकृतीला जास्त लाईक्स मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे, असे समजू नका. अनेक जण लाईक करतात. पण त्यातील मजकूरही त्यांनी वाचलेला नसतो, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी मांडले.कार्टुनिस्ट कंबाईनतर्फे आयोजित व्यंगचित्रकार संमेलनात सोशल मीडिया आणि व्यंगचित्रे या परिसंवादात ते बोलत होते. व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडित, महेंद्र भावसार, गणेश जोशी, ‘लोकमत’च्या पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी आदी मान्यवर यात सहभागी झाले होते.बोधनकर म्हणाले, सोशल मीडियाचा वापर मी गेली पाच वर्षे करत आहे. हे एक प्रभावशाली माध्यम आहे. सोशल मीडियाचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे. सोशल मीडियामुळे घराघरात बातमी लगेच पोहोचते. त्यासाठी दुसºया दिवशीच्या वृत्तपत्राची आपण वाट पाहत नाही. समाजाला व्यंगचित्र कळत नाही, असे जर कलावंताला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. समाज कलावंताची परीक्षा घेत असतो.चित्रकारांनीही स्वत:च स्वत: चे परीक्षण केले पाहिजे. दुसºयांनी चुका दाखवून देण्याची वेळ येऊ नये. व्यंगचित्र लपविले तर ओळी कळणार नाही आणि ओळी लपविल्या तर व्यंगचित्र कळणार नाही. ही व्यंगचित्राची खरी ताकद आहे. अशाप्रकारची व्यंगचित्रे कलावंतानी काढली पाहिजे. व्यंगचित्रकारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांत संचार करावा म्हणजे त्यांची व्याप्ती वाढेल, असे त्यांनी सांगितले.चारूहास पंडित म्हणाले, सध्या चांगले कार्टुनिस्ट राहिले नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मीडियाजवळ कार्टुनिस्टकडे बघण्याचा डोळा नाही. या काळातही चांगले कार्टुनिस्ट तयार होत आहेत. आताच्या काळात ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमेच चांगले होते किंवा लोकमान्य टिळकांचे अग्रलेख चांगले होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कार्टुनिस्टमध्येही वेगळे प्रवाह येतात. आपले व्यंगचित्र कोण पाहते, हे समजून घेतले तर त्यातून जास्त सुस्पष्टता येईल. कलावंतालाही अपग्रेड होता येईल. एखाद्या व्यंगचित्राला १५ लाख लोकांनी लाईक केले तर त्यांचा आर्थिक उपयोग काय? असे वाटेल. पण त्या लोकांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. वृत्तपत्राच्या तुलनेत सोशल मीडियाला लिमिटेशन नसतात. फेसबुक, युट्युुबपुरता आता सोशल मीडिया मर्यादित राहिलेला नाही. इन्स्टाग्राम, ट्विटर अशी अनेक माध्यमे आहेत. त्यातूनही अर्थाजन करता येऊ शकते. सोशल मीडिया हे व्यंगचित्रकारांसाठी वृत्तपत्रांच्या पुढचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.प्रशांत कुलकर्णी म्हणाले, एखाद्या कलावंताला मासिकात किंवा वृत्तपत्रात व्यंगचित्र छापण्याची संधी मिळते. एखाद्याला ती मिळत नाही. पण सोशल मीडियावर प्रत्येकाला संधी मिळतेच. माझ्या व्यंगचित्रात काय त्रुटी आहेत, हे सांगणारे संपादक मला माझ्या सुदैवाने मला भेटले. सोशल मीडियात व्यंगचित्र प्रसिध्द करताना एक ज्येष्ठ व्यक्ती संपर्कात हवी. जी आपल्याला त्रुटी सांगू शकतील. ही एक त्रुटी सोडली तर हे माध्यम अफाट आहे. आपल्या व्यंगचित्रामुळे दंगली व्हाव्यात, असे कोणत्याही व्यंगचित्रकाराला वाटणार नाही. एखाद्या विषयावर मतभेद असू शकतात. त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. पण बहिष्कार टाकणे योग्य नाही. आपला देश , समाजाचे भान राखल्यास सोशल मीडियासारखे माध्यम नाही, असे त्यांनी सांगितले.गणेश जोशी म्हणाले, प्रिंट मीडिया असो किंवा सोशल मीडिया, तेथील वाचक कोणत्या भाषेचा आहे याच काय त्या मर्यादा असतात.जर चित्र काढताना शब्दाची गरजच नसेल, तर ते कोणत्याही विषयावर असले तरी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचून त्यावर रिप्लाय येतो. त्यांचा न्यायनिवाडा लगेच होतो. तुम्ही चुकीचे मांडले तर त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटतात. कार्टुनवर नेत्याला काही वाटत नाही. पण कार्यकर्ता विभागला गेला आहे. त्यांच्यात मतभेद दिसून येतात.कोणता रंग वापरायचा, असा प्रश्न हल्ली निर्माण होतो. कलावंताला सगळे रंग सारखे असतात. पण आपल्याकडचे रंगही जाती-धर्मात विभागले गेले आहेत. कट्टरवाद, धार्मिक, जातीयवाद यांचा फटका तुम्हाला नक्की बसतो. कोणाच्या भावना दुखवल्यास माफीही मागता आली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.कैलास म्हापदी यांनी सांगितले, सोशल मीडियाचे मूळ प्रिंट मीडियात आहे. व्यंगचित्रकारांनी चित्राचा दर्जा सुधारण्यासाठी रोजची वृत्तपत्रे वाचली पाहिजेत. लोक समजून घेतले पाहिजेत. वृत्तपत्रांचे वाचन केले नाही तर चित्रे बोन्सायसारखी होतील. बदलत्या जमान्याबरोबर चित्रकारांनीही बदलले पाहिजे. नंदकुमार टेणी म्हणाले, ज्यांच्यामुळे कॅरेक्टर सुचतील अशा व्यक्ती माझ्या काळात होत्या याबद्दल बाळासाहेब ठाकरे स्वत:ला भाग्यवान समजत. व्यंगचित्रकारांची रेषा, डौल चांगला हवा. कार्टुनिस्टला व्यंग नेमके पकडता यायला हवे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया