शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

ठाण्यामधील बाजारपेठांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 01:11 IST

दुचाकीच्याही रांगा । महापालिका, पोलिसांच्या आवाहनास फासला हरताळ

ठाणे : प्रतिबंधित क्षेत्र वगळता शुक्रवारपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा खुल्या झाल्या. परंतु, पहिल्या दिवशी पालिकेच्या चुकीच्या आदेशामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर सुधारीत आदेश काढल्यानंतर शनिवारपासून बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र, सकाळपासून नागरिकांनी जांभळीनाका, खारकर आळी, स्टेशन रोड, नौपाडा परिसरातील दुकांनांमध्ये गर्दी केली. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर शहरातील विस्कटलेली अर्थव्यवस्था शुक्रवारपासून सुरू झाली. यात अर्थव्यवहार हे सम आणि विषम तारखेलाच सध्या सुरूराहणार आहेत. त्यातही महापालिके च्या आदेशामुळे पोलीस आणि व्यापााऱ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर शुक्रवारी सांयकाळी महापालिकेने सुधारीत आदेश काढून तो दूर केला. परंतु, त्यामुळे शुक्रवारी नौपाडा, जांभळीनाका येथील दुकाने बंद करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी सम आणि विषण तारखेनुसार दुकाने पुन्हा खुली झाली. या दुकांनामधून सामान घेण्यासाठी ठाणेकरांनी जांभळीनाका, खारखर आळी, नौपाडा भागातील दुकानांमध्ये एकच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. यावेळी तोंडाला मास्क लावला असला तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते. खारकर आळीत तर दुचाकींच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथून पायी चालतांनादेखील तारवरची कसरत करावी लागत होती. विशेष म्हणजे ही दुकाने आता नेहमीच खुली राहणार असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहनही महापालिका तसेच पोलिसांनी केले. मात्र, त्याकडे ठाण्यातील नागरिकांनी कानाडोळ केल्याचेच चित्र होते.दुकानाची वेळ बदलल्याने व्यापाऱ्यांचा विरोधअंबरनाथ : नगरपालिकेने दुकानदारांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातच सकाळी ७ ते १२ या वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश काढल्याने त्याला अंबरनाथ व्यापारी संघटनेने विरोध केला आहे. शुक्रवारी पालिकेने नवीन आदेश काढत दुकाने केवळ सकाळी ७ ते १२ पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र, सकाळी ७ ची वेळ ही योग्य नसल्याचे मत व्यक्त करून व्यापाºयांनी ही वेळ बदलण्याची मागणी केली आहे. या कालावधीत ग्राहक दुकानात येणे शक्य नसल्याचे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खानजी धल यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या