शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

‘फोर्ब्स’च्या यादीतील अब्जाधीशांचे सामाजिक योगदान शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 1:40 AM

दरवर्षी फोर्ब्स मासिक प्रसिद्ध करीत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत किमान दहा भारतीय अब्जाधीशांचा समावेश असतो

डोंबिवली : दरवर्षी फोर्ब्स मासिक प्रसिद्ध करीत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत किमान दहा भारतीय अब्जाधीशांचा समावेश असतो. मात्र भारतामधील गोरगरीबांच्या समस्या सोडवण्यात या श्रीमंतांचे काडीमात्र योगदान नाही, अशी खंत नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी व्यक्त केली.डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता सभारंभात राज्यपाल आचार्य बोलत होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाहक संजय कुलकणी, संजय हिंगे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी प्रसाद भिडे यांनी केले.राज्यपाल आचार्य म्हणाले की, श्रीमंताच्या यादीत भारतीय श्रीमंताची नावे दरवर्षी येतात. ज्यामुळे त्यांची नावे या यादीत झळकली तो देश, ती शाळा, त्यांचा मित्र परिवार, समाज यांच्यासाठी त्यांचे काहीच योगदान नसते. श्रीमंतांची जर इतकी अनास्था असेल तर देशाची आर्थिक प्रगती कशी होणार, असा सवाल त्यांनी केला. यादीतील दहा श्रीमंतांपैकी किमान ९ जण मुंबईत राहणारे असतात. मुंबईची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे. त्यापैकी ७० लाख लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांचे जीवन नरकावस्थेपेक्षा बत्तर आहे. आदिवासींच्या जीवनापेक्षाही शहरी गरीबांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांना आदिवासींप्रमाणे मोकळा आणि स्वच्छ आॅक्सिजन मिळू शकत नाही. शहरी गरीबांचे व देशातील अन्य भागातील गरीबांचे राहणीमान उंचावण्यात या श्रीमंताचे योगदान नाही. ही शोकांतिका आहे. त्याचा विचार शिक्षण संस्थांनी केला पाहिजे.शिक्षण आणि व्यवसाय, उद्योगातील संधी यांचे प्रमाण आपल्याकडे व्यस्त आहे. परिणामी आपल्याकडे बेरोजगारीची समस्या जास्त आहे. बेरोजगार पदवीधर निर्माण करुन देश कमजोर झाला की बलशाली हा खरा प्रश्न आहे. जातीपातीच्या नावावर देशाला विघटीत न करता. भारत हा जन्मत: धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे सगळ््यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.विद्यार्थी घडवत असताना तो आत्मकेंद्रीत वृत्तीचा असता कामा नये. त्याच्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या विकासासाठी झाला पाहिजे. तरच आपण खरे विद्यार्थी घडविले असे मला वाटते. शिक्षणाच्या यशाचे मापदंड चुकीचे असता कामा नये. आपल्याकडे विकासाचा रोडमॅप असला पाहिजे. रोजगार, शिक्षण आणि वीज या तीन महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्या देशात ६८ टक्के युवकांचे प्रमाण आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिंक साधनसंपत्ती आहे. त्याचा उपयोग करुन भारत हा महासत्ता होऊ शकतो असे आचार्य यांनी नमूद केले.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, एक-एक व्यक्ती मिळून कुटुंब तयार होते. कुटुंब मिळून परिवार तयार होतो. परिवार मिळून देश तयार होतो. देशाच्या हिताचे काम करणे हे संघाचे व्रत आहे. विद्यार्थी घडवित असताना समाजमन विकसीत करण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण संस्थेने केले आहे.