शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:11 IST

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारच्या ऑनलाईन तहकूब महासभे दरम्यान ज्येष्ठ भाजप नगरसेविका प्रभात पाटील यांच्या बंगल्यात साप शिरला. पाटील यांनी महासभेतच हा मुद्दा मांडल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेऊन तो साप पकडला. मात्र, साप आदी वन्यजीव आढळल्यास वन विभागाकडे संपर्क साधण्याच्या महापालिकेनेच जारी केलेल्या आदेशाचे अग्निशमन दलाने उल्लंघन करत नगरसेवकासाठी धाव घेतली. मग आता सामान्य नागरिकांसाठीसुद्धा अशीच तत्परता पालिका दाखवणार का? असा प्रश्न स्वतः पाटील यांनीच केला आहे . 

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. साप आदी दिसल्यास लोक घाबरत असल्याने अग्निशमन दलास पाचारण करून त्यांना पकडले जायचे. परंतु महापालिकेने नुकताच आदेश जारी करून या पुढे साप आदी वन्यजीव आढळून आल्यास वन विभागास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पुढे साप आदी पकडण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

कारण अग्निशमन दलाचे जवान हे साप आदी वन्यजीव पकडताना त्यांना नीट हाताळत नसल्याने वन्यजीव जखमी झाल्याचे तसेच वन्यजीव पकडून फोटोसेशन करणे आदी आरोप तसेच काही तक्रारी आल्याने वन विभागाने पालिकेस वन्यजीव पकडू नये असे निर्देश दिले . 

तोच शुक्रवारी ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेविका प्रभात पाटील यांच्या भाईंदर, इंद्रलोक येथील बंगल्यात साप आल्याचा मुद्दा त्यांनी महासभेत उपस्थित केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या बंगल्यात धाव घेऊन साप पकडून नेला. 

पाटील म्हणाल्या, माझ्या बंगल्यात तसेच परिसरात नेहमीच साप येत असतात. लोक घाबरत असल्याने अग्निशन दलाचे जवान त्यांना कळवताच साप पकडून नेत होते. पण आता अग्निशमन दल साप पकडणार नसल्याने वन विभागास संपर्क केला असता त्यांचे क्रमांक लागत नाहीत. वास्तविक पालिकेने पर्याय म्हणून सर्पमित्र तैनात केले पाहिजे होते. सर्पमित्र व वन विभागासाठी जागा दिली पाहिजे. परंतु कोणतीच पर्यायी व्यवस्था न करताच पालिकेने असा निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. मी नगरसेविका आहे म्हणून अग्निशन दल धावून आले. पण सामान्य नागरिकांसाठी धावून जाणार का ? हाच खरा प्रश्न आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरsnakeसापFire Brigadeअग्निशमन दल