शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:11 IST

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारच्या ऑनलाईन तहकूब महासभे दरम्यान ज्येष्ठ भाजप नगरसेविका प्रभात पाटील यांच्या बंगल्यात साप शिरला. पाटील यांनी महासभेतच हा मुद्दा मांडल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेऊन तो साप पकडला. मात्र, साप आदी वन्यजीव आढळल्यास वन विभागाकडे संपर्क साधण्याच्या महापालिकेनेच जारी केलेल्या आदेशाचे अग्निशमन दलाने उल्लंघन करत नगरसेवकासाठी धाव घेतली. मग आता सामान्य नागरिकांसाठीसुद्धा अशीच तत्परता पालिका दाखवणार का? असा प्रश्न स्वतः पाटील यांनीच केला आहे . 

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. साप आदी दिसल्यास लोक घाबरत असल्याने अग्निशमन दलास पाचारण करून त्यांना पकडले जायचे. परंतु महापालिकेने नुकताच आदेश जारी करून या पुढे साप आदी वन्यजीव आढळून आल्यास वन विभागास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पुढे साप आदी पकडण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

कारण अग्निशमन दलाचे जवान हे साप आदी वन्यजीव पकडताना त्यांना नीट हाताळत नसल्याने वन्यजीव जखमी झाल्याचे तसेच वन्यजीव पकडून फोटोसेशन करणे आदी आरोप तसेच काही तक्रारी आल्याने वन विभागाने पालिकेस वन्यजीव पकडू नये असे निर्देश दिले . 

तोच शुक्रवारी ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेविका प्रभात पाटील यांच्या भाईंदर, इंद्रलोक येथील बंगल्यात साप आल्याचा मुद्दा त्यांनी महासभेत उपस्थित केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या बंगल्यात धाव घेऊन साप पकडून नेला. 

पाटील म्हणाल्या, माझ्या बंगल्यात तसेच परिसरात नेहमीच साप येत असतात. लोक घाबरत असल्याने अग्निशन दलाचे जवान त्यांना कळवताच साप पकडून नेत होते. पण आता अग्निशमन दल साप पकडणार नसल्याने वन विभागास संपर्क केला असता त्यांचे क्रमांक लागत नाहीत. वास्तविक पालिकेने पर्याय म्हणून सर्पमित्र तैनात केले पाहिजे होते. सर्पमित्र व वन विभागासाठी जागा दिली पाहिजे. परंतु कोणतीच पर्यायी व्यवस्था न करताच पालिकेने असा निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. मी नगरसेविका आहे म्हणून अग्निशन दल धावून आले. पण सामान्य नागरिकांसाठी धावून जाणार का ? हाच खरा प्रश्न आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरsnakeसापFire Brigadeअग्निशमन दल