शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

महासभा सुरू असतानाच नगरसेविकेच्या घरात निघाला साप; अग्निशमन दलाने स्वतःचेच आदेश मोडून धाव घेत पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 21:11 IST

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या शुक्रवारच्या ऑनलाईन तहकूब महासभे दरम्यान ज्येष्ठ भाजप नगरसेविका प्रभात पाटील यांच्या बंगल्यात साप शिरला. पाटील यांनी महासभेतच हा मुद्दा मांडल्यानंतर अग्निशमन दलाने धाव घेऊन तो साप पकडला. मात्र, साप आदी वन्यजीव आढळल्यास वन विभागाकडे संपर्क साधण्याच्या महापालिकेनेच जारी केलेल्या आदेशाचे अग्निशमन दलाने उल्लंघन करत नगरसेवकासाठी धाव घेतली. मग आता सामान्य नागरिकांसाठीसुद्धा अशीच तत्परता पालिका दाखवणार का? असा प्रश्न स्वतः पाटील यांनीच केला आहे . 

मीरा भाईंदर परिसरात मोठ्या संख्येने अजगर, साप आदी वन्य जीव रहिवासी इमारती अथवा नागरिक्षेत्रात आढळून येतात. साप आदी दिसल्यास लोक घाबरत असल्याने अग्निशमन दलास पाचारण करून त्यांना पकडले जायचे. परंतु महापालिकेने नुकताच आदेश जारी करून या पुढे साप आदी वन्यजीव आढळून आल्यास वन विभागास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या पुढे साप आदी पकडण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान येणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

कारण अग्निशमन दलाचे जवान हे साप आदी वन्यजीव पकडताना त्यांना नीट हाताळत नसल्याने वन्यजीव जखमी झाल्याचे तसेच वन्यजीव पकडून फोटोसेशन करणे आदी आरोप तसेच काही तक्रारी आल्याने वन विभागाने पालिकेस वन्यजीव पकडू नये असे निर्देश दिले . 

तोच शुक्रवारी ऑनलाईन महासभा सुरु असताना नगरसेविका प्रभात पाटील यांच्या भाईंदर, इंद्रलोक येथील बंगल्यात साप आल्याचा मुद्दा त्यांनी महासभेत उपस्थित केला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांच्या बंगल्यात धाव घेऊन साप पकडून नेला. 

पाटील म्हणाल्या, माझ्या बंगल्यात तसेच परिसरात नेहमीच साप येत असतात. लोक घाबरत असल्याने अग्निशन दलाचे जवान त्यांना कळवताच साप पकडून नेत होते. पण आता अग्निशमन दल साप पकडणार नसल्याने वन विभागास संपर्क केला असता त्यांचे क्रमांक लागत नाहीत. वास्तविक पालिकेने पर्याय म्हणून सर्पमित्र तैनात केले पाहिजे होते. सर्पमित्र व वन विभागासाठी जागा दिली पाहिजे. परंतु कोणतीच पर्यायी व्यवस्था न करताच पालिकेने असा निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना वाऱ्यावर सोडले आहे. मी नगरसेविका आहे म्हणून अग्निशन दल धावून आले. पण सामान्य नागरिकांसाठी धावून जाणार का ? हाच खरा प्रश्न आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरsnakeसापFire Brigadeअग्निशमन दल