शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘स्मार्ट सिटी’ची आर्थिक गुंतवणूक बारगळणार?, कोरियन कंपनीसोबत केलेला सामंजस्य करार धूळखात पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 02:06 IST

केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर महापालिकेने सरकारकडे एक हजार ४४५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल पाठविला होता.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी एप्रिल २०१७ मध्ये कोरियन कंपनीशी सामंजस्य करार केला होता. दोन वर्षे आठ महिने उलटून गेले, तरी त्याचे पुढे काहीही झालेले नाही. हा करार सध्या धूळखात पडला असून, कंपनीकडून केली जाणारी आर्थिक गुंतवणूक बारगळण्याच्या मार्गावर आहे.केडीएमसीची स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झाल्यावर महापालिकेने सरकारकडे एक हजार ४४५ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल पाठविला होता. त्याला सरकारने मंजुरी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पास आर्थिक व तांत्रिक साहाय्य पुरविण्यासाठी महापालिकेने कोरिया सरकारच्या ‘कोरिया लॅण्ड हाउसिंग कॉर्पोरेशन’ या कंपनीशी सामंजस्य करार केला. या करारावर ६ एप्रिल २०१७ ला स्वाक्षरी झाली. त्यावेळी तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन आणि महापौर राजेंद्र देवळेकर होते.स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने कोरियन कंपनीशी करार केला होता. त्याच कराराच्या धर्तीवर महापालिकेने करार केला. केडीएमसीप्रमाणेच पुणे व नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आर्थिक व तांत्रिक सहकार्यासाठी कोरियन कंपनीकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, कल्याण-डोंबिवलीत विकासाला वाव असल्याने कंपनीने केडीएमसीशी करार केला.शहरातील खाडीकिनारा सुशोभीकरण, रेल्वे परिसर वाहतूकमुक्त, वाहतुकीचे नियोजन, रस्ते विकास, आयटी कंपन्या, ग्रीन लॅण्डचा विकास करून त्याद्वारे नोकऱ्या उपलब्ध होतील, असा दावा कराराच्या वेळी करण्यात आला होता. प्रकल्पांचे मास्टर प्लान कंपनीकडून केले जाणार होते. मात्र, चार हजार कोटींच्या अर्थसाहाय्याविषयी केंद्रासोबत कंपनीचे धोरण ठरल्यावर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कंपनीकडून मिळणारी मदत महापालिकेस वितरित केली जाणार होती. हे अर्थसाहाय्य कमी व्याजदराने पुरविले जाईल, असे म्हटले होते.कोरियन कंपनीसोबतचा करार थंडबस्त्यात पडण्याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रातील भाजप सरकार सत्तेत आणि राज्यात विरोधी बाकावर आहे. तसेच भाजपने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याच्या मन:स्थितीत शिवसेनाप्रणीत महाविकास आघाडीचे सरकार दिसत नाही. बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरविचार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. त्याच धर्तीवर अनेक प्रकल्पांचा फेरविचार होऊ शकतो. भाजपच्या काळात कोरियन कंपनीशी झालेला सामंजस्य करार विद्यमान सरकार पुढे नेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. याशिवाय राज्यातील सरकार बदलल्याने महापालिकेतील अधिकारीवर्गाने कच खाल्ली आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही कोरियन कंपनीशी झालेल्या कराराची वाच्यता केली जात नाही.कराराविषयी अनभिज्ञता : केडीएमसीने सापाड, वाडेघर येथील २८४ हेक्टर जागेवर विकास परियोजना राबविण्याचा इरादा राज्य सरकारकडे व्यक्त केला होता. या विकास परियोजनेलाही कोरिया कंपनीचे आर्थिक सहकार्य मिळणार होते. विकास परियोजनेची अधिसूचना राज्य सरकारने २४ डिसेंबरला काढली. त्यानंतर २५ जानेवारीपर्यंत हरकती, सूचना घेतल्या गेल्या आहेत.राज्य सरकारच्या अधिसूचनेत कोरियन कंपनीच्या कराराचा काहीच उल्लेख नाही. महापालिकेच्या नगररचना विभागाने या कंपनीशी झालेल्या कराराविषयी अनभिज्ञता दाखविली आहे. सरकार बदलल्याने ही सोयीस्कर भूमिका अधिकारी घेत आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटी व विकास परियोजनेसाठी कोरिया कंपनीकडून मिळणारे आर्थिक पाठबळ बारगळणार आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी