शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

भिवंडी-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:15 IST

भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे.

- मुरलीधर भवार ।कल्याण : भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. काही ठिकाणी भूसंपादन शिल्लक असल्याने तो प्रश्न निकाली निघताच प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात केली जाईल. जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा उड्डाणरस्ता (एलिव्हेटेड कॉरिडॉर) तयार करण्यात येणार आहे.पालकमंत्री एकनाथ शिंदे या रस्त्याच्या कामाचा आढावा मंगळवारी घेतला. या बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. त्यामुळे या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला सरकारने मंजुरी दिली आहे. सरकारने भूसंपादनासाठी नऊ कोटींचा निधी ठेवला आहे. रस्त्याचे सहा पदरीकरण करण्यासाठी सरकारने निविदा प्रसिद्ध करुन कंत्राटदार कंपनी नेमली आहे. काही ठिकाणी हा रस्ता रेल्वेमार्ग ओलांंडून जाणार आहे. तेथे लागणाऱ्या जास्तीच्या जागेवर लवकरच तोडगा काढून भूसंपादनाची प्रक्रिया गतीमान करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी अधिकाºयांना दिले. भूसंपादनाचा प्रश्न सुटताच रस्त्याचे काम सुरू होईल. या रस्त्यालगतची झाडे तोडावी लागणार आहेत. त्याला महापालिकेने मंजुरी दिली आहे.या जमिनीवरील रस्त्याचे सहा पदरीकरण पूर्ण झाल्यावर कोन ते शीळ असा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. त्याला राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा समितीने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी किती पैसे लागतील, तो कसा असेल, याचे तपशील त्यात येतील. हा कॉरिडॉर कोन ते पत्रीपुलादरम्यान कल्याण खाडीवरुन नेताना त्याची रचना कशी असेल तेही त्यातून स्पष्ट होईल. सध्याचे खाडीपूल पुरेसे आहेत की स्वतंत्र खाडीपूल उभारला जाईल हे त्यातून स्पष्ट होईल.>रिंगरोडच्या दुर्गाडी-टिटवाळा मार्गाच्या कामाला सुरुवातकल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रिंगरोडच्या कामाला दुर्गाडी परिसरातून सुरुवात झाली आहे. दुर्गाडी ते मांडा-टिटवाळा या मार्गावरच चौथा, पाचवा, सहावा आणि सातवा टप्पा आहे आणि तो १६.२ किलोमीटरचा आहे. त्यात ५२ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यासाठी भूसंपादन विभागाने नोटिसा दिल्या होत्या. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने तत्कालीन आयुक्त पी. वेलरासू यांनी जमीन संपादनाच्या बदल्यात प्रकल्पबाधितांना टीडीआर देण्याचे आश्वासन दिल्याने महिनाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. ५२ हेक्टरपैकी २९ हेक्टर जमीनमालकांनी टीडीआर घेऊन भूसंपादनाला अनुमती दिली आहे. तेथे रिंगरोडचे काम करण्यास एमएमआरडीएच्या कंत्राटदाराला अडचण येणार नाही. महापालिकेने प्रत्यक्ष रस्त्यासाठी लागणाºया जागेतील बाधितांसाठी टीडीआर देण्याचे जाहीर केले असले, तरी रस्ते प्रकल्पात रस्त्याच्या बाजूला असलेली घरेही बाधित होणार आहेत. पण त्यांच्या मोबदल्याचे, पुनर्वसनाचे धोरण महापालिकेने जाहीर केलेले नाही. एमएमआरडीएने ८०० कोटींच्या रिंगरोड प्रकल्पबाधितांच्या नुकसानभरपाईची तरतूद केलेली नाही.प्रकल्प भूसंपादनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १५ कोटींची तरतूद असली, तरी भरपाई पैशाच्या स्वरुपात दिला नाही. अर्थात पैसे मिळत नसल्याने भूसंपादनाची प्रक्रिया संथ असल्याची टीकाही केली जाते. भूसंपादन विभागात केवळ दोन जण नेमले आहेत. ठोकपगारी व्यक्ती तेथे अत्यल्प मानधनावर काम करीत आहेत. तेथे स्टाफ कमी असल्याने भूसंपादनाला गती येत नसल्याचे अधिकारी सांगतात.

टॅग्स :kalyanकल्याण