शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे  जिल्ह्यातील सहा हजार हेक्टरवरील पीक - जमीन नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 19:47 IST

जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. तर एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अशंता पडझड झाली. जिल्ह्याभरात तब्बल २७ जणांचा या पूर आपत्तीत मृत्यू झाला. तर या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते

ठळक मुद्देपाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेत जमिनीचे नुकसानपीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवारी, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत पाच हजार ८०० हेक्टर पीकां नुकसानीची पाहणी केली. तर ८७ हेक्टर जमिनीची पाहणी

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची वस्तुस्थितीची दोन दिवशीय पाहाणी केंद्रीय पथकाने आज ठिकठिकाणी जावून केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या सहाय्याने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसान पाहणी केली आहे.         केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवारी, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भात पिकासह शेत जमिनीच्या नुकसानीची पाहाणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूक कोंडीचा फटका बसला. पेण जवळील अमरापूर परिसरात वाहतूक कोंडीत अडकले होते. तरी शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीक पाहणीचे प्रजेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन आज सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगांव येथील पीक नुकसानीची पाहाणी केली.

          बदलापूर जवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसान ग्रस्त घरांची पाहाणी या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भात पिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रीकल अ‍ॅथोरीटीचे सह संचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणी आयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील , केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधिक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांसह ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकूश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्हा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेत जमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ठ होते.        या केंद्रीय पाहणी पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पीकां नुकसानीची पाहणी केली. तर ८७ हेक्टर शेत जमिनीच्या नुकसानीची देखील वस्तुस्थिती पाहणी या केंद्रीय पथकामने केली. या पाहणी दौऱ्यांत कल्याण तालुक्यात वसात- शेलवली येथील पीक नुसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीची पाहणीचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याुनसार या पथकाने पाहणी केली. यामध्य कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसान पाहणी देखील या दौऱ्यांत करण्यात आली. या पाहणीच्या वेळी मात्र पाऊस ठिकठिकाणी असतानाही छत्रीचा वापर करून भर पावसात संबंधीत शेत जमीन व पीक नुकसान शेतावर प्रत्यक्ष जावून करण्यात आल्याचे आढळून आले.        जिल्ह्यात गेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्ट च्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदी नाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे जिल्ह्यातील दहा हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. तर एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अशंता पडझड झाली. जिल्ह्याभरात तब्बल २७ जणांचा या पूर आपत्तीत मृत्यू झाला. तर या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते. एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्यामंढ्या सारख्या १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. तर सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ठ झाले आहे. याशिवाय ८७ हेक्टरवरील शेत जमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याची जिल्हह्यातील शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे.................फोटो - ३१ ठाणे केंद्रीय पथक

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी