शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कंपनीची संरक्षक भिंत कोसळून सहा घरांचे नुकसान

By अजित मांडके | Updated: March 15, 2024 17:28 IST

कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली.

अजित मांडके, ठाणे : कळवा येथील आनंद नगर भागात असलेल्या एकविरा संकुल चाळीवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास घडली. ही भिंती येथील सहा घरांवर पडली असूून त्यामुळे येथील रहिवाशांच्या घरातील वस्तुंचे नुकसान झाले असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवतीहानी झालेली नसल्याची माहिती त्यांनी दिली.शुक्रवारी दुपारच्या सुमारास एकविरा संकुल चाळ येथील सहा घरांवर मुकुंद कंपनीची संरक्षक भिंत पडली. यावेळी घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व इतर पथक घटनास्थळी दाखल झाले. ही भिंत अंदाजे ८० फुट लांब व २० फुट उंच असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच यावेळी एक झाडही त्यामुळे पडल्याचे दिसून आले आहे. या घटनेत राघव जेना, मिनाक्षी कदम, वासुदेव साळवी, ललितकुमार खोत, संगिता पाटील आणि जयवंत माळी यांच्या घरावर ही भिंत पडली. यात घराच्या भिंती व छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. तर एक वृक्षही पडल्याने ते हटविण्याचे कामही यावेळी करण्यात आले.

टॅग्स :kalwaकळवाthaneठाणे