शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरणारे सहा जण झाले तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 2:58 AM

रेल्वे प्रवासात मोबाइल चोरटे सुसाट असताना त्यांच्यावर वचक बसण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या सराईत मोबाइल चोरट्यांना अखेर ठाणे

ठाणे : रेल्वे प्रवासात मोबाइल चोरटे सुसाट असताना त्यांच्यावर वचक बसण्यासाठी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या सराईत मोबाइल चोरट्यांना अखेर ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड यासारख्या पोलीस कार्यक्षेत्रांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. अशा प्रकारे मागील १५ महिन्यांत सहा जणांना तडीपार केले असून त्यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.ठाणे रेस्थानकात प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच गर्दीत चोरटे हातचलाखीने मोबाइल लांबवत आहेत. अशा प्रकारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात दिवसाला साधारणत: पाच गुन्हे दाखल होत आहेत. तसेच मागील वर्षभरात रेल्वे प्रवासात पाच लाख रुपये किमतीचे तीन हजार दोन मोबाइल फोन चोरीला गेले असून याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या आकडेवारीवरून रेल्वे प्रवासात चोरटे डोके वर काढू पाहत असताना लोहमार्ग पोलिसांनी पेट्रोलिंग, टॉप-२५ यादी यासारख्या उपाययोजना राबवण्यावर विशेष भर दिला आहे. त्याचबरोबर मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात वारंवार निदर्शनास येणाऱ्यांविरोधात तडिपारीचे प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे २०१७ मध्ये एकूण १७ मोबाइल चोरट्यांच्या तडिपारीचे प्रस्ताव तयार केले होते. त्यामध्ये चार जणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून त्याही रेकॉर्डवरील आहेत. तसेच, २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यांत दोन जणांना तडीपार केले आहे. त्या सर्वांना चार जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांसाठी तडीपार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार केल्यावर संबंधिताला काही एका ठरावीक कालावधीत पकडून वरिष्ठांसमोर हजर करावे लागते. त्यानंतर, तडिपारीची कारवाई केली जाते. मात्र, काही वेळा चोरटे मिळून येत नसल्याने त्यांना हजरही करता येत नाही. त्यातूनच तो प्रस्ताव रद्द होतो. त्यामुळे मोबाइल चोरटे तडीपार होण्याचे प्रमाण कमी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.