शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आल्याने विजय झाला सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:50 IST

मोदीलाटेचाही झाला फायदा : कपिल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ , पालकमंत्र्यांचे परिस्थितीवर होते जातीने लक्ष, मुस्लिमांची मतेही भाजपच्या पारड्यात

मुरलीधर भवार

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात नाराजी होती. ही नाराजी स्वपक्षातील नव्हे, तर शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची होती. ही नाराजी दूर झाल्याने आणि पुन्हा मोदीलाटेत त्यांना भरभरून मते मिळाल्याने पाटील पुन्हा खासदारपदी निवडून आले. मुरबाड मतदारसंघापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पाटील यांना मिळाली. त्यामुळे पाटील यांचे मताधिक्य वाढले आहे.

२०१४ मध्ये देशात मोदीलाट होती. या लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले पाटील हे पहिल्यांदा दिल्लीत गेले. मागच्या लोकसभा निवडणुकीत पाटील यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ९७ हजार ६१७ मते मिळाली होती. सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुका शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढवल्या. त्यानंतर, पुन्हा दोघे एकत्र आले. मात्र, चार वर्षे दोन्ही पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानली. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार, असे वाटत असताना ते पुन्हा एकत्र आले. त्यामुळे या पक्षांतील कार्यकर्त्यांची मने कशी जुळणार, हा प्रश्न होता. कार्यकर्ता मेळाव्यात शिवसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करून त्याची प्रचीती दिली. मात्र, ही नाराजी दूर करून पाटील यांना दीड ते दोन लाखांचे मताधिक्य कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देण्याची ग्वाही शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी दिली. या विधानसभा मतदारसंघातून पाटील यांना एक लाख १७ हजार ४४० मते मिळाली. २०१४ च्या तुलनेत पाटील यांंचे मताधिक्य १९ हजार मतांनी वाढले आहे. दीड ते दोन लाखांचे मताधिक्य देण्याचा दावा फोल ठरला असला, तरी शिवसेनेच्या साथीनेच हा विजय सुकर झाला, हे निश्चित. पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. भिवंडी लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सगळ्यात जास्त मते मुरबाड मतदारसंघातून, तर त्यापाठोपाठ कल्याण पश्चिमेतून सर्वाधिक मते पाटील यांना मिळाली.

पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ४९ हजार ३८५ मते मिळाली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांनी २०१४ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी विश्वनाथ यांना ३१ हजार ६३५ मते मिळाली होती. विश्वनाथ यांच्या तुलनेत टावरे यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसचे मताधिक्य वाढले. मात्र, कपिल पाटील यांचा विजय रोखता आला नाही. २०१९ मध्ये काँग्रेसची जवळपास १८ हजार मते वाढली आहेत. काँग्रेसला मनसेची साथ होती. मनसेनेही टावरे यांचे काम केले. त्यामुळे काँग्रेसचे मताधिक्य वाढले. काँग्रेसची मदार कल्याण पश्चिमेतील मुस्लिम मोहल्ल्यावर होती, मात्र बहुतांश मुस्लिम मोहल्ल्यातील मतदारांनी पुन्हा भाजपला पसंती दिली. २०१४ च्या निवडणुकीत मुस्लिम मतदारांनी काँग्रेसने आमची वर्षानुवर्षे फसवणूक केल्याने भाजपला मतदान करण्याचे जाहीर केले होते. यावेळेस तीन तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम मतदार भाजपच्या बाजूने फिरला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मनसेचे बाळ्यामामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांनी बंडाचे निशाण फडकवले होते. त्यांनी कपिल पाटील यांना मदत न करण्याची भूमिका सुरुवातीपासून घेतली होती. त्यामुळे त्यांच्या बंडाचा फायदा टावरे यांना होईल, असे बोलले जात होते; मात्र टावरे यांना मामाच्या बंडाचा फायदा झाला नाही.

वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरुण सावंत यांना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून १५ हजार २८९ मते मिळाली. निवडणुकीपूर्वी कल्याण पश्चिमेत प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांची प्रचारसभा झाली होती. कल्याण पश्चिमेतील बहुजन समाज व मुस्लिमांची मते वंचित आघाडीकडे वळली नाहीत.या निकालाचा पुढील विधानसभेवर काय परिणामलोकसभा निवडणुकीत पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसण्याचे आश्वासन देत शिवसैनिकांनी काम केले खरे. मात्र, सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कल्याण पश्चिम विधानसभेवर शिवसैनिकांनी दावा ठोकला आहे. सध्या भाजपचे नरेंद्र पवार हे आमदार आहेत. शिवसैनिकांनी कल्याण पश्चिमेचा मतदारसंघ मागितल्यास त्यावरून भाजप-शिवसेनेत पुन्हा कलह निर्माण होऊ शकतो. हा कलह पाटील व युतीसमोर आव्हान निर्माण करणारा ठरणार आहे. लोकसभेला मदत केली असली, तरी पुन्हा विधानसभेला मदत करणार नाही, या पवित्र्यात शिवसैनिक आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019kalyanकल्याणBJPभाजपा