शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

राष्ट्रवादीला आणखी भगदाड पडण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 02:29 IST

आव्हाडांना घेरण्याचे डावपेच : पक्षातील काही नेते उघडपणे शिवसेना-भाजपाच्या संपर्कात

ठाणे : पक्षाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत आमदार निरंजन डावखरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का बसलेला असतानाच आणखी काही नगरसेवक, पदाधिकारीही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यातून मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आव्हाड यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा शिवसेना, भाजपाचा प्रयत्न आहे. यात परमार प्रकरणात अडकलेल्या काही नगरसेवकांचा आणि सध्या आव्हाड यांच्या खांद्याला खांदा लावून नेतृत्त्व करणाऱ्या काही नेत्यांचाही समावेश असल्याची माहिती राष्टवादीतील सूत्रांनी दिली.कोकण पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपामध्ये जाताना डावखरे यांनी आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या राजकारणावर टीका केली. आव्हाड यांच्यावर झालेली टीका आजची नाही. यापूर्वीही आव्हाडांच्या कार्यशैलीला कंटाळलेल्या अनेकांनी एकतर पक्ष सोडला किंवा नेता बदलल्याचे दिसून आले. ठाण्यात राष्ट्रवादी एकसंध असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात वसंत डावखरे, जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक अशा तीन गटांत पक्ष विभागलेला होता. वसंत डावखरे यांच्या निधनाआधीच त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनानंतर पक्षातील त्यांचा गट जवळजवळ संपुष्टात आला, तर गणेश नाईक यांचा स्वत:चाच आमदारकीच्या निवडणुकीत पराभव झाल्याने त्यांचा ठाणे शहरातील दबदबाही कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतरही पालिका निवडणुकीत पक्षाचे ३४ नगरसेवक निवडून आल्याने त्यांचा प्रभाव वाढला. पण त्याचेच रूपांतर एकखांबी नेतृत्त्वात झाल्याचे बोलले जाऊ लागले. पण आव्हाड यांनी कळवा-मुंब्रावगळता ठाण्याकडे फारसे लक्षच दिले नसल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. केवळ आपल्या गटातील, आपल्या मर्जीतील मंडळींना मोठे करण्याचा अट्टहास सुरू झाल्याने अंतर्गत खदखद बाहेर पडू लागली. पक्षातील उमेदवाराविरोधात प्रचार करणे, आपल्या गटातील उमेदवार कसा निवडून येईल, यासाठी प्रयत्न करणे, गटबाजी करणे या मार्गाने ती बाहेर पडू लागली.निरंजन डावखरे यांच्या जाण्याने ठाण्यातील राष्ट्रवादीवर काही परिणाम होणार नसल्याचा दावा जरी केला जात असला, तरी येत्या काळात राष्ट्रवादीला आणखी मोठे धक्के बसतील, हे यातून समोर आले. काहींनी इतर पक्षात जाण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कळव्यातील राष्ट्रवादीचे एक दिग्गज दाम्पत्यही शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांचे पुत्र तर आव्हाडांविरोधात शिवसेनेतून आमदारकीसाठी लढण्याच्या तयारीला लागले आहेत. दुसरीकडे आव्हाडांच्या गटातील मानला जाणारा आणि राबोडी पट्ट्यातील एक बडा नगरसेवकही शिवसेनेच्या संपर्कात आल्याचे बोलले जाते. त्याने तर मुब्रा-कळव्यात आव्हाडांविरोधात शिवसेनापुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याची तयारी दर्शवल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी सांगितले. हाही आव्हाडांना मोठा धक्का मानला जातो. लोकमान्यनगर पट्ट्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवकही भाजपाच्या संपर्कात असून त्यांनी ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातून आमदारकीचे तिकीट मागितल्याचे भाजपा नेत्यांनी सांगितले. हा नगरसेवक भाजपात आला, तर त्याच्या सोबत असलेले आणखी तीन नगरसेवकही पक्षात येतील आणि भाजपाची ताकद वाढली, तर पालिकेतील राजकीय समीकरणेही बदलतील.निरंजन डावखरे हे तर आक्रमक नेतत्व : आव्हाड यांची तिरकस प्रतिक्रियानिरंजन डावखरे हे अत्यंत निष्ठावंत, प्रामाणिक आणि ‘आक्रमक’ युवा नेतृत्व होते. त्यांनी पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रचंड नुकसान झाले आहे, अशा तिरकस शैलीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पक्ष सोडण्यावर टीका केली आहे. निरंजन डावखरे यांच्या आक्र मकतेला पक्ष मुकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहे. या काळात निरंजन यांच्या आक्र मकतेमुळे सत्ताधारी ‘भयकंपित’ झाल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांची कुवत, आक्र मकता, अभ्यासपूर्ण राजकीय प्रगल्भता, त्यांची क्षमता महाराष्ट्राने पाहिली. त्यामुळेच त्यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांना प्रचंड दु:ख झाले, असे आव्हाडांनी म्हटले आहे. आपले वडील वसंत डावखरे यांना राष्ट्रवादीने दिलेला सन्मान, आमदारकीच्या २४ वर्षांपैकी १८ वर्षे दिलेले उपसभापतीपद, त्यातून मिळालेले फायदे, स्वत: निरंजन यांना राष्ट्रवादीने दिलेली आमदारकी, राज्य पातळीवर युवक अध्यक्ष म्हणून नेतृत्त्व करण्याची दिलेली संधी, सन्मान आणि प्रतिष्ठा, पवार कुटुंबीयांचा जिव्हाळा याचे स्मरण तरी निरंजन यांना पक्ष सोडताना व्हायला हवे होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNiranjan Davkhareनिरंजन डावखरेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण