शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मीरा भाईंदर मध्ये कारशेड साठी झाडे तोडण्यास विरोध करत स्वाक्षरी मोहीम सुरूच

By धीरज परब | Updated: May 4, 2025 21:39 IST

Mira Road: मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत आहेत. 

मीरारोड - मेट्रो कारशेड साठी उत्तन - डोंगरी येथील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या एमएमआरडीएच्या प्रस्तावा विरोधात मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमा सुरूच आहेत. झाडे तोडण्यास आणि हजारो पक्षी, वन्यजीव यांना उध्वस्त करू नका अशी मागणी नागरिक करत आहेत.

भाईंदर पश्चिमेस खाऊ गल्ली जवळ संत विन्सेंट दि पॉल शाळेच्या कल्पना चावला गाईड कंपनीच्या विद्यार्थिनींनी झाडे तोडू नका अशी मागणी करत सह्यांची मोहीम चालवली. शाळेच्या संचालिका ममता मोरायस सह त्यांच्या सहकारी ह्यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी, नागरिकांना निसर्गरम्य अश्या डोंगर परिसरातील १२ हजार ४०० झाडे काढण्या बद्दल आणि तेथील विविध प्रजातींचे हजारो पक्षी, वन्य जीव देखील नष्ट होऊन निसर्गाची मोठी हानी होणार असल्याची माहिती दिली. नागरिकांनी देखील झाडे तोडण्यास विरोध दर्शवत सह्यांच्या मोहिमेत सहभाग नोंदवला.

मीरारोडच्या रामदेव पार्क येथील मीनाताई ठाकरे सभागृह जवळ बविआचे निलेश साहू यांनी रोज सायंकाळी झाडे तोडू नये म्हणून स्वाक्षरी मोहीम चालवली आहे. उत्तन नाका येथे दिव्यांग आधार संस्थेच्या दिव्यांगांनी स्वाक्षरी मोहीम राबवली. मीरारोड भागात मराठी एकीकरण समितीने तर भाईंदर पश्चिमेस काँग्रेस कार्यालय व शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेत झाडे तोडून नागरिकांचा ऑक्सिजन हिरावून घेऊ नका म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

भाईंदरच्या चौक आणि पाली गावात रविवारी उत्सवाच्या निमित्ताने झाडे तोडून कारशेड करण्यास विरोध करत स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात आल्या. तर मीरारोड येथील कनकीया भागात सावित्रीबाई फुले उद्यान जवळ झाडे तोडण्यास विरोध दर्शवणारी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. भाईंदर पश्चिम भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी झाडे वाचवण्यासाठी सह्या घेतल्या. या शिवाय शहरातील अनेक नागरिक, विविध संस्था व राजकीय पक्षाचे अनेक पदाधिकारी देखील झाडे तोडू नये म्हणून स्वाक्षरी अभियानात सहभागी झाले आहेत.  चे सांगत चे एमएमआरडीए ने प्रस्तावित केले असले तरी प्रत्यक्ष झाडांची संख्या मोठी आहे.

कारशेडसाठी मेट्रो स्टेशन जवळ मोकळ्या जमिनी असताना थेट डोंगरावर १२ हजार ४०० झाडे तोडून कारशेड बनवण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला. आधीच तापमान खूप वाढले आहे. प्रदूषण वाढले आहे. त्यात ऑक्सिजन देणारी व तापमान आणि प्रदूषण कमी करणारी झाडे इतक्या मोठ्या संख्येने तोडणे निंदनीय असल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरenvironmentपर्यावरण