शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीला रिक्षांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:41 IST

स्टेशन परिसर बळकावले : १० ते १५ हजार रिक्षा धावताहेत रस्त्यांवर

कल्याण : कल्याण आरटीओ हद्दीत सध्या ४३ हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा स्टेशन परिसर हे रिक्षांनी व्यापलेले आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने स्टॅण्डही अपुरे पडत आहेत. स्टॅण्डमधील रिक्षा बाहेर रस्त्यावर येऊ लागल्याने स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

राज्य सरकारच्या मुक्त परवाना धोरणामुळे कल्याण आरटीओ हद्दीत ४३ हजार रिक्षा आहेत. रिक्षा जास्त व प्रवासी कमी, असे चित्र दिसून येत आहे. निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ७०० रिक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या १० ते १५ हजार रिक्षांच्या घरात पोहोचली आहे. तर, अन्य रिक्षा टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांत आहेत.

कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर एक भले मोठे रिक्षास्टॅण्ड आहे. तेथून उल्हासनगरमधील कॅम्प नंबर १ ते ३ पर्यंत जाण्यासाठी रिक्षांच्या तीन मोठ्या रांगा लागतात. याशिवाय काही रिक्षाचालक रांगेव्यतिरिक्त रिक्षाचालक संघटनेच्या कार्यालयासमोरून भाडे घेतात. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला अन्य काही रिक्षाचालक रिक्षा आडव्या लावतात. टांगा आणि रिक्षास्टॅण्ड असलेल्या जागेतून लालचौकी, खडकपाडा येथे जाणाऱ्या रिक्षांच्या तीन रांगा लागतात. तसेच तेथे शेजारीच मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहतात. त्याच्याविरुद्ध दिशेपासून बसडेपो व साधना हॉटेलपर्यंत टाटानाका, सूचकनाका, भिवंडी, बैलबाजार, पत्रीपुलाकडे जाणाऱ्या रिक्षा उभ्या असतात. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर रस्त्याच्या आतील बाजूला रिक्षास्टॅण्ड आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात रिक्षांचा भरणा पाहायला मिळतो.

रिक्षास्टॅण्डमधून भाडे घेऊन बाहेर पडणाºया रिक्षाचालकांची साइड भाडे भरणारे रिक्षाचालक अडवणूक करतात. तसेच बस डेपोतून बाहेर पडणाºया व डेपोच्या आत येणाºया बसला मार्गच उपलब्ध नसतो. खडकपाडा, मोहने या दिशेला जाणाºया कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनच्या बसला उभ्या राहण्यासाठी जागा नसते. दीपक हॉटेलसमोर रिक्षा आडव्यातिडव्या उभ्या केल्या जातात. याठिकाणाहून बिर्ला कॉलेज, प्रेम आॅटो, सिंडिकेट येथे साइड भाडे भरले जाते. मात्र, या रिक्षाचालकांविरोधात काहीच कारवाई केली जात नाही. रिक्षाचालक वाहतूक पोलीस व वॉर्डनला दाद देत नाही. चौक तिथे रिक्षास्टॅण्ड अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्वत्रच रिक्षांची गर्दी झाल्याचेदिसत आहे.डोंबिवलीच्या कोंडीतही पडतेय भरडोंबिवली पूर्वेत आणि पश्चिमेतही अशीच स्थिती आहे. पूर्वेतील इंदिरा गांधी चौक हा चारही बाजूने स्टॅण्डने वेढला आहे. एसटीचा पनवेलचा बसथांबा हा रिक्षाचालक व लोढासंकुलाचे भाडे भरणाºया टॅक्सीचालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे इंदिरा गांधी चौकातून मार्ग काढणे जिकिरीचे होते. तसेच अरुंद रस्त्यांमुळे कोंडीत अधिक भर पडते. केळकर रोडवरील रिक्षास्टॅण्डची रांग पार रामकृष्ण हॉटेलपर्यंत लागते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत आहे.च्पश्चिमेला द्वारका हॉटेल, रसरंजन हॉटेल, जुन्या विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील रिक्षास्टॅण्ड आहे. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील दुकाने तोडून अतिक्रमण हटवले. त्याठिकाणी बसथांबे केले. मात्र, या मोकळ्या जागेवरून रिक्षाचालक साइड भाडे घेत आहेत. त्यामुळे मोकळी जागाही रिक्षाचालकांनी बळकावली आहे.च्पश्चिमेला फलाट क्रमांक १ च्या बाहेर ठाकुर्ली दिशेला रिक्षाचालक मनमानीपणे रिक्षा उभ्या करतात. तेथून गणेशनगर, गरिबाचावाडा, सुभाष रोड, चिंचोड्याचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा येथे रिक्षा जातात. रिक्षाचालकांमुळे तेथे कोंडीत भर पडते.च्डोंबिवलीत कोंडीवर मात करण्यासाठी एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्डचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची निविदा काढली जात नाही.