शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

कल्याण-डोंबिवलीला रिक्षांचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:41 IST

स्टेशन परिसर बळकावले : १० ते १५ हजार रिक्षा धावताहेत रस्त्यांवर

कल्याण : कल्याण आरटीओ हद्दीत सध्या ४३ हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा स्टेशन परिसर हे रिक्षांनी व्यापलेले आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने स्टॅण्डही अपुरे पडत आहेत. स्टॅण्डमधील रिक्षा बाहेर रस्त्यावर येऊ लागल्याने स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

राज्य सरकारच्या मुक्त परवाना धोरणामुळे कल्याण आरटीओ हद्दीत ४३ हजार रिक्षा आहेत. रिक्षा जास्त व प्रवासी कमी, असे चित्र दिसून येत आहे. निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ७०० रिक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या १० ते १५ हजार रिक्षांच्या घरात पोहोचली आहे. तर, अन्य रिक्षा टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांत आहेत.

कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर एक भले मोठे रिक्षास्टॅण्ड आहे. तेथून उल्हासनगरमधील कॅम्प नंबर १ ते ३ पर्यंत जाण्यासाठी रिक्षांच्या तीन मोठ्या रांगा लागतात. याशिवाय काही रिक्षाचालक रांगेव्यतिरिक्त रिक्षाचालक संघटनेच्या कार्यालयासमोरून भाडे घेतात. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला अन्य काही रिक्षाचालक रिक्षा आडव्या लावतात. टांगा आणि रिक्षास्टॅण्ड असलेल्या जागेतून लालचौकी, खडकपाडा येथे जाणाऱ्या रिक्षांच्या तीन रांगा लागतात. तसेच तेथे शेजारीच मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहतात. त्याच्याविरुद्ध दिशेपासून बसडेपो व साधना हॉटेलपर्यंत टाटानाका, सूचकनाका, भिवंडी, बैलबाजार, पत्रीपुलाकडे जाणाऱ्या रिक्षा उभ्या असतात. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर रस्त्याच्या आतील बाजूला रिक्षास्टॅण्ड आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात रिक्षांचा भरणा पाहायला मिळतो.

रिक्षास्टॅण्डमधून भाडे घेऊन बाहेर पडणाºया रिक्षाचालकांची साइड भाडे भरणारे रिक्षाचालक अडवणूक करतात. तसेच बस डेपोतून बाहेर पडणाºया व डेपोच्या आत येणाºया बसला मार्गच उपलब्ध नसतो. खडकपाडा, मोहने या दिशेला जाणाºया कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनच्या बसला उभ्या राहण्यासाठी जागा नसते. दीपक हॉटेलसमोर रिक्षा आडव्यातिडव्या उभ्या केल्या जातात. याठिकाणाहून बिर्ला कॉलेज, प्रेम आॅटो, सिंडिकेट येथे साइड भाडे भरले जाते. मात्र, या रिक्षाचालकांविरोधात काहीच कारवाई केली जात नाही. रिक्षाचालक वाहतूक पोलीस व वॉर्डनला दाद देत नाही. चौक तिथे रिक्षास्टॅण्ड अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्वत्रच रिक्षांची गर्दी झाल्याचेदिसत आहे.डोंबिवलीच्या कोंडीतही पडतेय भरडोंबिवली पूर्वेत आणि पश्चिमेतही अशीच स्थिती आहे. पूर्वेतील इंदिरा गांधी चौक हा चारही बाजूने स्टॅण्डने वेढला आहे. एसटीचा पनवेलचा बसथांबा हा रिक्षाचालक व लोढासंकुलाचे भाडे भरणाºया टॅक्सीचालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे इंदिरा गांधी चौकातून मार्ग काढणे जिकिरीचे होते. तसेच अरुंद रस्त्यांमुळे कोंडीत अधिक भर पडते. केळकर रोडवरील रिक्षास्टॅण्डची रांग पार रामकृष्ण हॉटेलपर्यंत लागते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत आहे.च्पश्चिमेला द्वारका हॉटेल, रसरंजन हॉटेल, जुन्या विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील रिक्षास्टॅण्ड आहे. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील दुकाने तोडून अतिक्रमण हटवले. त्याठिकाणी बसथांबे केले. मात्र, या मोकळ्या जागेवरून रिक्षाचालक साइड भाडे घेत आहेत. त्यामुळे मोकळी जागाही रिक्षाचालकांनी बळकावली आहे.च्पश्चिमेला फलाट क्रमांक १ च्या बाहेर ठाकुर्ली दिशेला रिक्षाचालक मनमानीपणे रिक्षा उभ्या करतात. तेथून गणेशनगर, गरिबाचावाडा, सुभाष रोड, चिंचोड्याचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा येथे रिक्षा जातात. रिक्षाचालकांमुळे तेथे कोंडीत भर पडते.च्डोंबिवलीत कोंडीवर मात करण्यासाठी एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्डचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची निविदा काढली जात नाही.