शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीला काँग्रेसचे श्राद्ध आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:17 IST

भाईंदर - मोदी सरकारने व्यवहारातून अचानक एक हजार व पाचशेच्या चलनी नोटा बाद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केला.

भाईंदर - मोदी सरकारने व्यवहारातून अचानक एक हजार व पाचशेच्या चलनी नोटा बाद केल्याचा निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केला. त्यावेळी अनेकांना कित्येक महिने दिवसभर बँकेपुढे रांगा लावून आपली आर्थिक चणचण भागवावी लागली. या कालावधीत देशभरातील ८७ लोकांना जीव गमवावा लागला.तत्पूर्वी केंद्र सरकारने नवीन नोटांचे नियोजन करणे आवश्यक असतानाही ते गांभीर्याने घेण्यात आले नाही. परिणामी लोकांना आर्थिक व्यवहारात चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा भासला. अनेकांचे विवाह लांबले तर काहींचे मोडले. यात केवळ सामान्य जनता व लहान व्यापारी भरडले गेले असून, त्याचा फायदा मात्र भाजपाच्या निकटवर्तीय बड्या उद्योजकांना झाला.तसेच लहान उद्योगांवर उदरनिर्वाह करणारे कामगार तसेच शेतकरी या अर्थपुर्ण नोटाबंदीमुळे आर्थिक अडचणीत सापडले. आजही नोटाबंदीचा फटका सामान्य जनतेला बसत असताना केंद्र सरकारने लहान व्यापारी व सामान्य जनतेवर जीएसटीचे भूत मानगुटीवर बसवले. यामुळे सामान्यांचे आर्थिक ताळेबंद कोलमडले असल्याने त्याचा निषेध नोंदविण्यासाठी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने बुधवारी पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी हजार व पाचशेच्या नोटांना श्राद्ध घालुन आंदोलन छेडण्यात आले. तसेच या नोटाबंदीमुळे जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, पालिका गटनेता जुबेर इनामदार, माजी उपमहापौर नुरजहाँ हुसेन, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, नगरसेविका उमा सपार, सहारा अक्रम, पदाधिकारी अंकुश मालुसरे, प्रकाश नागणे आदींनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर