शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

नवलेखकांनी लिखाणाचा गांभीर्याने विचार करावा - सुनील कर्णिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 1:22 AM

नवीन लेखकांना आपणच ग्रेटच लिहितो असे वाटत असते. त्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.

ठाणे : नवीन लेखकांना आपणच ग्रेटच लिहितो असे वाटत असते. त्यांनी आपल्या लेखनाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. संशोधन करण्यासाठी लागणारी चिकाटी, जिद्द ही पूर्वीच्या अभ्यासकांपेक्षा आजच्या काळातील अभ्यासकांकडे कमी पडत आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सुनील कर्णिक यांनी व्यक्त केले.कोमसाप, ठाणे शहर शाखा व जवाहर वाचनालय कळवा याच्या संयुक्त विद्यमाने रविवारी पाचवा वाचकमंच जवाहर वाचनालय कळवा कै. शिवराम पाटील सभागृहात झाला. प्रा. दीपा ठाणेकर यांनी कर्णिक यांची मुलाखत घेतली. यावेळी कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्राबाहेरही मराठी साहित्य विषयक घडामोडी चालू असतात, त्यात मराठी मधील किती साहित्य अनुवादित झाले हे पाहणे फार गरजेचे आहे. तशा प्रकारचे काम मला करायला मिळत आहे त्याचा आनंदच आहे. लेखकांनी कोणत्या काळात काय लिहावे हे आपण ठरवू शकत नाही, त्यांना जे आणि जसे व्यक्त व्हायचे तसे ते होतात. मात्र, वाचन कला, काव्य, साहित्य यांचा मिलाफ असलेला हा वाचकमंच अभिरु चि संपन्न वाचन संस्कृतीचा प्रसार करू शकतो, असे त्यांनी सांगितले. कोमसापच्या अध्यक्षा मेघना साने यांनी प्रास्ताविक केले.यामिनी पानगावकर यांनी ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या कादंबरीतील गूढाचा वेध आणि भेद किती परिणामकारकपणे करतेय, हे कुतूहल रसिकांच्या मनात उत्पन्न केले. मीना बर्दापूरकर यांनी गिरीश कुबेर यांच्या ‘एका तेलिया’ने कथेची दमदार सुरु वात केली. आरती कुलकर्णी यांनी भारती मेहता लिखित ‘मन पाखरू’चे अत्यंत मनस्वी विश्लेषण केले आणि कादंबरीतील संस्कारक्षम जग भावले. मयुरी कदम यांनी सुभाष भेंडे लिखित ‘अंधारवाटा’ कादंबरीतील कथेत पात्रांच्या जीवनात होणारी मुल्यांची घसरण व त्यामुळे पुढे येणारा अंधार याचे चित्र रंगविले.वैशाली राजे या शिक्षिकेने सुमती क्षेत्रमाडे लिखित ‘महाश्वेता’ या कादंबरीचे महत्त्व सांगून कोड असलेल्या व्यक्तींना रोगी न समजण्याचा कादंबरीतील संदेश समजावून सांगितला.

टॅग्स :thaneठाणे