शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसीचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:39 AM

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक ...

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक असून ते केवळ चार दिवस पुरणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने पाच हजार डोसची मागणी केली आहे.

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत. जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढत नाही तोपर्यंत केंद्र वाढविण्यात काही एक अर्थ नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली जात आहे. दररोज हजार नागरिकांना लस देता येईल त्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, लसींचा पुरवठा अल्प असल्याने २५० नागरिकांना त्रास देणे शक्य होत आहे. आजघडीला अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एक हजार लस शिल्लक असून ते अवघे तीन ते चार दिवसच पुरवणार आहेत. अल्पप्रमाणात लस शिल्लक असल्याची बातमी नागरिकांपर्यंत जात असल्याने आता डोस घेण्यासाठी आणि त्यासाठी लागणारे टोकण मिळवण्यासाठी पहाटे सहा वाजल्यापासून नागरिक रांग लावत आहेत.

बदलापुरातदेखील लसींचा पुरवठा बंद असल्याने अवघे दोन दिवस पुरेल एवढ्या लस शिल्लक असून बदलापूर पालिकेने पाच हजार लस उपलब्ध व्हावे, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. बदलापुरातदेखील चार केंद्रांमध्ये दररोज २५० नागरिकांना लस देण्यात येत असून त्या ठिकाणी लस घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करीत आहेत.