शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

भारतभर जनता कर्फ्यूमुळे दुकानं बंद; स्वामी फाऊंडेशनकडून फळे, पाणी, बिस्किटची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 17:01 IST

तसेच एखाद्याला गरजू व्यक्ती आढळल्यास त्यांचीही जेवणाची सोय केली जाईल, असे आवाहन महेश कदम यांनी केले आहे.

आज भारतभर जनता कर्फ्यू असल्याने खाण्यापिण्यापासून सर्वच दुकाने बंद आहेत. पोलीस, डॉक्टर, नर्स,  फिल्डवर काम करणारे पत्रकार यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आज स्वामी फाऊंडेशनने फळे, पाणी, बिस्किटची सोय केली आहे. गर्दी टाळण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते तीन तीनच्या गटाने फळांच्या पिशव्या संस्थेच्या कार्यालयात तयार करीत आहेत. स्वामी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांनी ही सोय केली आहे. तसेच एखाद्याला गरजू व्यक्ती आढळल्यास त्यांचीही जेवणाची सोय केली जाईल, असे आवाहन महेश कदम यांनी केले आहे. स्वामी फाऊंडेशनच्या कार्यालयात  8767711117 , 9029666567 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कदम यांनी केले आहे.कोरोनावर मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा प्रयत्न करीत आहे. डॉक्टर, नर्सेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झटत आहात. पोलीसही रस्त्यावर दिवस रात्र राबत आहेत. अचूक बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारही काम करीत आहेत. यात त्यांचे खण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे या उद्देशाने मी ही सोय केली आहे. काही ठिकाणी असे आढळून आले की, काही गोर गरीब आपल्या गावावरून काही कामानिमित्त आले. त्यांना कर्फ्युची माहिती नव्हती आज जायला निघाले परंतु गाडी नसल्याने ते रस्त्याच्या कडेला बसून आहेत, खायला काही मिळते का पाहायला गेले तर दुकाने बंद आहेत. स्वामी फाऊंडेशनचे कदम यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांना फळे नेऊन दिली आहेत. तसेच अशा जेवणाची सोय ही केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेने आदल्या दिवशीच 250 किलो फळे, 200 किलो संत्री, 300 किलो कलिंगड, 300 बिस्कीट पुडे, 100 डझन केली, 50 बॉक्स पाणीच्या बाटली आणून ठेवल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस