शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुकानदार, फेरीवाल्यांमुळे निर्माण झाल्या बेकायदा कचराकुंड्या; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 19:56 IST

मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे.

मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. बेकायदा कचराकुंड्या निर्माण करणा-या दुकानदार, फेरीवाल्यांसह याकडे दुर्लक्ष करणा-या पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांवर देखील कारवाईची मागणी सत्ताधारी भाजपाच्याच नगरसेवकांकडून होऊ लागली आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेने दैनंदिन साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा उचलणे बंधनकारक आहे. परंतु अनेक भागात घरांमधून वा दुकानदारांकडून कचरा थेट घेतला जात नाही. त्यातच शहरात बसणारे फेरीवाले देखील जाताना कचरा तेथेच टाकून जातात. यामुळे ठिकठिकाणी बेकायदा कचराकुंड्या निर्माण झाल्या असून, कचराकुंडीमुक्त शहराचा पालिकेचा दावा फसवा ठरलाय.या बेकायदा कचरा कुंड्यांवर उंदीर, घुशी, गुरं - ढोरं, कुत्री - मांजरी, डुक्कर व अन्य पक्ष्यांचा राबता असतो. शिवाय दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे परिसरातील रहिवासी त्रासले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. परंतु महापालिका अधिकारी मात्र कामचुकारपणा करणा-या ठेकेदारासह बेकायदा कचराकुंड्या निर्माण करणा-या दुकानदार, फेरीवाले आदींवर कारवाईच करत नाही. त्यामुळे शहरात सर्रास कुठेही कचरा टाकला जात असल्याने उकीरडे निर्माण झाले आहेत.मीरा रोडच्या प्रभाग १३ मधील भाजपा नगरसेविका अनिता मुखर्जी यांनी देखील महापौर डिंपल मेहतांसह उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, आरोग्य अधिकारी संदीप शिंदे यांना या प्रकरणी लेखी तक्रार केली आहे. दुकानदार, फेरीवाले हे सर्रास कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकत असल्याने शांती विद्या नगरी, गौरव व्हेली, काशी, घोडबंदर, शिफ्टिंग आदी विविध परिसरात जागोजागी बेकायदा कच-याकुंड्या तयार झाल्या आहेत. जेणेकरून सर्वत्र दुर्गंधी व अस्वच्छता पसरल्याने रहिवाशी त्रस्त आहेत.पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी देखील कचरा टाकणा-या फेरीवाले, दुकानदार यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे अधिका-यांसह फेरीवाले, दुकानदार यांच्यावर कारवाईची मागणी मुखर्जी यांनी केली आहे. सर्व परिसर आधी पालिकेने स्वच्छ करावा व त्यासाठी ठोस कायदेशीर कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकhawkersफेरीवाले