शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात उड्डाणपुलावर सेना-राष्ट्रवादी आमनेसामने; आधी घोषणाबाजी नंतर गळ्यात गळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 07:22 IST

शिंदे-आव्हाडांकडून दोस्तीच्या आणाभाका; खारेगावात महाविकास आघाडीत घोषणायुद्ध

ठाणे  : मागील काही दिवसांपासून खारेगाव रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या मुद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जोरदार कलगीतुरा रंगला होता. शनिवारी उद्घटनाच्या दिवशी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परस्परांच्या समोर उभे राहून तुफान घोषणाबाजी केल्याने महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांमधील पूल किती डळमळीत असल्याचे दर्शन महाराष्ट्राला घडले. ‘एकनाथ शिंदे आगे बढो’च्या घोषणा शिवसैनिक देत होते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘जितेंद्र आव्हाड आगे बढो’ या घोषणाबाजीने प्रत्युत्तर देत होते. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची तारेवरची कसरत सुरू होती. शनिवारी या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते झेंडे, बँनर घेऊन दुपारपासून कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर होते. राष्ट्रवादीचे व शिवसेनेने श्रेय घेणारे बॅनर दोन्हीकडे लागल्याचे दिसत होते. राष्ट्रवादीच्या बॅनरवर ‘वचनपूर्ती’ असा उल्लेख होता, तर शिवसेनेच्या बॅनरवर ‘सततच्या पाठपुराव्याला यश’ असा उल्लेख होता. कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी कार्यकर्त्यांमध्ये तुफान घोषणायुद्धाला सुरुवात झाली. पाठपुरावा महत्त्वाचा - श्रीकांत शिंदेखारेगाव पुलासाठी यापूर्वी प्रयत्न झाले असतील, मात्र पाठपुरावा महत्त्वाचा असतो. २००८-०९ मध्ये या पुलासाठी प्रयत्न झाले. परंतु खऱ्या अर्थाने २०१४ नंतर पाठपुरावा झाला. राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांचे नाव न घेता, खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. कोपरीपेक्षा कळवा - मुंब्य्राला पालकमंत्र्यांनी दोन हजार कोटींचा निधी दिला असून यातून पालकमंत्री शिंदे यांचे आव्हाड यांच्यावर किती प्रेम आहे, याची जाणीव होते.जितेंद्र आव्हाड म्हणाले :  एकनाथ शिंदे आणि माझी मैत्री फार वेगळी आहे, त्यांच्याकडे केव्हाही निधी मागितला तर त्यांनी तो दिला नाही, असेच कधीच घडले नाही. शिंदे आणि माझ्यात एका अबोल मैत्रीचे ऋणानुबंध आहेत, तो धागा तुटणार नाही, याची काळजी श्रीकांत शिंदे यांनी घ्यावी आणि हा धागा आणखी मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाची पत्रिका छापतांना एकदा विचारले असते तर आम्ही पुढाकार घेतला असता आणि वाद, घोषणाबाजीची वेळ आली नसती. जयंत पाटील यांच्या हातून पुलाचे लोकार्पण व्हावे अशी इच्छा यापूर्वी आपण व्यक्त केली असली तर त्यानंतर झालेल्या वादानंतर पुन्हा मीच एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व्हावे असेही स्पष्ट केले होते. आपला प्रमुख शत्रू कोण आहे, हे ओळखून आपण एकत्र येणे गरजेचे असून ठाण्यात महाविकास आघाडी व्हावी ही पूर्वीही इच्छा होती आणि आतादेखील आहे. एकनाथ शिंदे म्हणाले : शिवसेनेचे मिशन कळवा हे महाविकास आघाडीचे नगरसेवक अधिक संख्येने निवडून आणण्याकरिता आहे.  तुम्हाला वाटत असेल तर तुम्हीदेखील मिशन वागळे राबवा आम्ही तुम्हाला अडविणार नाही. पण मिशन सोडून कमिशनला हात लावणे अयोग्य आहे, कोणावरही वैयक्तिक टीका करणे अयोग्य असून मी कधीही पालिकेत माझी फाईल मंजूर करा, असे सांगितले नाही, त्यामुळे टीका करताना सांभाळून  करा. आव्हाड आणि माझी मैत्री आहे. पक्षाच्या हिताकरिता आम्ही आमच्या भूमिका बदलेल्या असतील तरी आमची मैत्री कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका निवडणुकीत काम करू या. पुलाच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधातील बॅनर लागले, घोषणाबाजी झाली, मात्र हे यापुढे करू नका.उद‌्घाटन नेमके कोणाच्या हस्ते..? नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड दोघांनीही रिबीन धरून ठेवली होती. दोघांच्याही हातात कात्री होती. त्यामुळे उद्घाटन नेमके कोणाच्या हस्ते? हा मुद्दा गुलदस्त्यात राहिला...

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना