शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

निवडणुकीपूर्वी शिवसेनेची खेळी; ५०० चौ. फुटांच्या घरांना करमाफीचा ठरावाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 20:49 IST

पालिकेच्या तिजोरीवर पडणार कोटय़ावधीचा भार, ठरू नये निवडणुकीचा जुमला, भाजपानं लगावला टोला

ठाणे  : ठाणे  महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. त्याला तब्बल साडेचार वर्षानी मुर्त स्वरुप आल्याचे दिसत आहे. गुरुवारी झालेल्या महासभेत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. परंतु कोरोनामुळे पालिकेची सध्याच्या आर्थिक स्थिती पाहता, हा ठराव किती तग धरणार हे पाहणो महत्वाचे ठरणार आहे. परंतु दुसरीकडे हा केवळ निवडणुकीचा जुमला ठरु नये अशी भावना देखील व्यक्त केली जात आहे.

गुरुवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा दाखला देत, त्यांनी ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजुर करावा आणि शासनाकडे पाठवावा असे सांगितले आहे. त्यानुसार तसा ठराव सभागृहात घ्यावा अशी सुचना केली. त्याअनुषंगाने सभागृह नेते अशोक वैती यांनी तसा ठराव सभागृहात मांडला. त्याला विरोधी पक्षनेते शाणु पठाण यांनी मंजुरी दिली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी मार्च २०२१ पासून याची अंमलबजावणी करण्याची सुचना केली. सत्ताधारी शिवसेनेकडून ठाणो महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफीचे वचन दिले होते. परंतु आता साडेचार वर्षानंतर त्याला मुर्त स्वरुप देण्यात येत आहे. त्यामुळे कोरोना काळात निश्चितच ठाणोकरांसाठी ही गोड बातमी ठरणार आहे. त्यानुसार हा ठराव तयार करुन अंतिम मंजुरीसाठी शिष्ठ मंडळ घेऊन जाईल आणि त्याला मंजुरी आणून दाखवेल असा विश्वास यावेळी महापौर म्हस्के यांनी व्यक्त केला.

भाजपाची काढली हवासत्ताधाऱ्यांनी अचानकपणे हा ठराव मंजुर करुन घेऊन भाजपच्या विरोधाची हवाच काढली. त्यामुळे तब्बल २१ महिन्यानंतर होणाऱ्या  महासभेत सत्ताधाऱ्यांना सळोकी पळो करण्याच्या तयारीत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांची एकाच फटक्यात सत्ताधाऱ्यांनी हवा काढली. त्यामुळे विरोध सोडून त्यांना देखील या ठरावाच्या बाजूने कौतुक करावे लागले. परंतु हा ठराव लवकर मंजुर करुन आणून ठाणोकरांना दिलासा द्यावा अशी मागणी करतांना हा निवडणुकीचा जुमला ठरु नये असेही भाजपने यावेळी मत व्यक्त केले.

ठरू नये निवडणुकीचा जुमलाकोरोनामुळे पालिकेच्या तिजोरीवर परिणाम झालेला आहे. सध्याच्या घडीला तिजोरीत अवघे ७ कोटी शिल्लक आहेत. त्यात मागील महिन्यात सातव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर १०० कोटींहून अधिकच बोजा पडणार आहे. शिवाय ठेकेदारांची आजही ६५० कोटींचे बिले अदा करायची आहेत. तसेच पालिकेवर सुमारे ४ हजार कोटींचे दायीत्व आहे. त्यात आता ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा परिणाम देखील पालिकेच्या तिजोरीवर होणार आहे. हा ठराव मंजुर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर १५० ते १७५ कोटींच्या वर बोजा पडणार असल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली. त्यामुळे सातवा वेतन आयोग आणि करमाफी यामुळे पालिकेला सुमारे २७५ कोटींहून अधिकच उत्पन्नाला मुकावे लागणार आहे. त्यातही काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ लोकप्रतिनिधी देखील करमाफी शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा निवडणुकीचा जुमला तर ठरणार नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका